AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्नवत डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातील 5 सुंदर ठिकाणे

तुमच्या लग्नाचा दिवस खास आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी डेस्टिनेशन वेडिंगचा विचार करत आहात? भारतात अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही तुमच्या स्वप्नातील लग्न प्रत्यक्षात आणू शकता आणि ते क्षण कायम स्मरणात ठेवू शकता.

स्वप्नवत डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातील 5 सुंदर ठिकाणे
destination wedding
| Edited By: | Updated on: Aug 02, 2025 | 2:20 PM
Share

तुमच्या लग्नाला खास आणि अविस्मरणीय बनवायचं असेल, तर डेस्टिनेशन वेडिंग हा एक उत्तम पर्याय आहे. भारतामध्ये अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही तुमच्या स्वप्नातील लग्न अगदी परिकथेसारखं प्रत्यक्षात आणू शकता. चला, भारतातील अशा 5 खास डेस्टिनेशन वेडिंग ठिकाणांविषयी जाणून घेऊया, जे तुमचा दिवस आणखी खास बनवतील.

उदयपूर : जर तुम्हाला एखाद्या राजकुमारा किंवा राजकुमारीसारखं लग्न करायचं असेल, तर उदयपूर हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील सिटी पॅलेस, ताज लेक पॅलेस आणि ओबेरॉय उदयविलास यांसारख्या आलिशान हॉटेल्समुळे तुमच्या लग्नाला एक खास ‘रॉयल थीम’ मिळेल. तलावांच्या शहरातलं सौंदर्य तुमच्या लग्नातील प्रत्येक क्षणाला अधिक खास बनवेल.

जयपुर : राजस्थानची राजधानी जयपुर ऐतिहासिक किल्ले आणि सुंदर हवेलींसाठी प्रसिद्ध आहे. इथे समोद पॅलेस, रामबाग पॅलेस आणि जयगड किल्ल्यासारखी ठिकाणे तुमच्या लग्नाला शाही अनुभव देतात. गुलाबी शहराचा रंग आणि तिथली पारंपरिक संस्कृती तुमच्या लग्नात एक वेगळीच मजा आणते.

गोवा : खुल्या आकाशाखाली, समुद्राच्या लाटांच्या आवाजात लग्न करण्याची तुमची इच्छा असेल तर गोव्याला नक्की भेट द्या. पालोलेम, वागाटोर आणि कैंडोलिम बीचवर लग्न करण्याचा अनुभव खूपच वेगळा असतो. लाइव्ह म्युझिक, सी-फूड आणि पार्टीचं वातावरण तुमच्या लग्नाला एक ‘फन’ टच देईल.

केरळ : केरळ हे बॅकवॉटर आणि हाऊसबोट वेडिंगसाठी ओळखले जाते. नारळाची झाडे, शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य या ठिकाणाला खूपच रोमँटिक बनवते. जर तुम्हाला जास्त गर्दी नको असेल आणि निसर्गाच्या सान्निध्यात लग्न करायचं असेल तर केरळ एक उत्तम पर्याय आहे.

मसुरी : डोंगरांच्या कुशीत वसलेली मसुरी एखाद्या परिकथेतील लग्नासाठी परफेक्ट आहे. सावॉय हॉटेल आणि जे डब्ल्यू मेरियटसारख्या ठिकाणी तुम्हाला डोंगरांच्या सुंदर दृश्यांसोबत पारंपरिक आणि आधुनिकतेचं मिश्रण पाहायला मिळेल. थंड हवा आणि ढगांच्या मध्ये लग्न करण्याचा अनुभव खरंच अविस्मरणीय असतो.

अंदमान आणि निकोबार : जर तुम्हाला गर्दीपासून दूर, शांत आणि खासगी ठिकाणी लग्न करायचं असेल, तर अंदमान आणि निकोबार हे एक उत्तम निवड आहे. हॅवलॉक आयलंड आणि नील आयलंडसारखी ठिकाणे स्वच्छ पाणी, पांढरी वाळू आणि सुंदर सूर्यास्तासह तुमच्या लग्नाला ‘ड्रीमी’ लुक देतील.

तुमच्या आवडीनुसार यापैकी कोणतंही ठिकाण निवडून तुम्ही तुमच्या लग्नाचा दिवस कायम स्मरणात ठेवू शकता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.