AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे जातात ते परत येतच नाहीत, भारतातील सर्वात खतरनाक स्थळे; माहिती वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही

तामिळनाडूचा कोल्ली हिल रोडही खरतनाक असल्याचं सांगितलं जातं. त्याचं कारण म्हणजे या रस्त्याची वळणं. डोंगर खोदून बनवलेला या रोडवर 70 बेंड आहेत.

जे जातात ते परत येतच नाहीत, भारतातील सर्वात खतरनाक स्थळे; माहिती वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही
Tourist DestinationsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 22, 2023 | 7:57 AM
Share

नवी दिल्ली: भारत हा सर्वात सुंदर असा देश आहे. निसर्गाने समुद्ध असा हा देश आहे. त्यामुळे आपल्या देशातील अनेक स्थळांना पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येत असतात. निसर्गाचा आनंद लुटत असतात. पण आपल्या देशात अशा काही जागा आहेत की तिथे जाणं मना आहे. कारण ही स्थळं अत्यंत खरतनाक मानली जातात. या ठिकाणी जे जातात ते परत येतच नाहीत, असं सांगितलं जातं. कारण यातील बरीचशी ठिकाणं निर्जनस्थळं आहेत. निर्जनस्थळ कोणतंही असो ते घातकच असतं. त्यामुळे तुम्हीही अशा ठिकाणी जाणार असाल तर खबरदारी घेऊनच जा. कुणाला तरी सांगून जा. नाही तर शक्यतो अशा निर्जनस्थळी जाणं टाळाच.

बीच सुंदर पण…

गुजरातच्या सूरतमध्ये दमास बीच प्रसिद्ध आहे. या बीचवर मावळत्या सूर्याला पाहण्याचा आनंद हा वेगळाच आहे. पण या ठिकाणी रात्री फिरण्यास मनाई आहे. रात्रीच्यावेळी ही जागा अत्यंत खतरनाक असल्याचं सांगितलं जातं. या ठिकाणाहून रात्रीच्यावेळी अनेक लोक गायब झाल्याचं सांगितलं जातं.

तापमान असे की…

लडाखच्या खारदुंग ला येथे जाणं म्हणजे हिंमतीचं कामच आहे. खारदुंग ला जितकं सुंदर आहे. तितकच खरतनाकही आहे. कारण या ठिकाणी किमान तापमान मायनस 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं. त्यामुळे जीवाला धोका संभवू शकतो. म्हणून ही जागा पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक मानली जाते.

शापित गाव

राजस्थानच्या कुलधरा बाबत अनेक दंतकथा आहेत. कुलधरा हे गाव जैसलमेरच्या वाळवंटातील छोटसं गाव आहे. आधी या गावात लोक गुण्यागोविंदाने राहत होते. पण अचानक लोक रातोरात हे गाव सोडून गेले. लोक हे गाव का सोडून गेले हे कुणालाच माहीत नाही. पण ही जागा शापित असल्याचं काही लोक मानतात.

खतरनाक वळणांचा रस्ता

तामिळनाडूचा कोल्ली हिल रोडही खरतनाक असल्याचं सांगितलं जातं. त्याचं कारण म्हणजे या रस्त्याची वळणं. डोंगर खोदून बनवलेला या रोडवर 70 बेंड आहेत. या मार्गावर एक रहस्यमयी मुलगी लोकांना ठार करते असं सांगितलं जातं. तसेच या डोंगरावर एक वेगळीच प्रतिमा पाहायला मिळाली. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना लोक घाबरतात.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.