AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरीरात व्हिटॅमिन B12 कमी झाल्यावर काय खावे माहितीये पण वाढल्यानंतर काय करावे?

Health Tips : व्हिटॅमिन बी 12 कमी झाले असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणं महत्त्वाचं असतं. पण जर ते जास्त झालं तरी देखील तुम्हाला काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचू शकते. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 घेण्याचे तोटे आहेत.

शरीरात व्हिटॅमिन B12 कमी झाल्यावर काय खावे माहितीये पण वाढल्यानंतर काय करावे?
| Updated on: Dec 12, 2024 | 7:41 PM
Share

Vitamin B 12 : व्हिटॅमिन बी12 आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. या जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर शरीरात अनेक गंभीर आजार उद्भवतात. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता सुरू झाल्यास बहुतेक लोक फूड सप्लिमेंट्स घेतात. पण जर कोणत्याही शरीरात व्हिटॅमिन बी 12 जास्त झाले तर मात्र काय करावे हे अनेकांना माहित नसेल. हो व्हिटॅमिन बी12 जास्त झाले तरी ते शरीरासाठी चांगले नसते.

जर बी 12 जीवनसत्व शरीरात जास्त झाले तर तुम्हाला मळमळ, उलट्या आणि डोकेदुखी या सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अतिसार, थकवा आणि अशक्तपणा येतो. व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण जास्त असल्यास त्वचेवर लाल पुरळ देखील येतात.

व्हिटॅमिन बी 12 वाढल्यास घाबरू नका

व्हिटॅमिन बी 12 शरीरात खूप प्रमाणात वाढले तर घाबरून जाऊ नका. व्हिटॅमिन बी 12 हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. जे किडनी आणि लघवीद्वारे बाहेर जाते. 2 ते 4 आठवड्यांत त्याचे परिणाम दिसू लागतात.

कोणत्या गोष्टी खाऊ नये

जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 जास्त झाले तर आठवडा तुम्ही काही गोष्टींचे सेवन टाळले पाहिजे. व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण जास्त असेल तर चिकन, मासे आणि सॅल्मन फिश तसेच दूध, दही आणि दुग्धजन्य पदार्थ अजिबात खाऊ नयेत. कारण शरीरात जास्त B12 असल्यास रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. काही लोकांच्या ऑप्टिक मज्जातंतूला देखील नुकसान होऊ शकते. तर मुलांमध्ये अंधत्वाची समस्या येऊ शकते.

व्हिटॅमिन बी 12 घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे?

डॉक्टरांच्या माहितीनुसार, व्हिटॅमिन बी 12 हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. B1, B2, B6 आणि B9 हे देखील पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे आहेत. व्हिटॅमिन सी देखील असेच काम करते. ही सर्व जीवनसत्त्वे रिकाम्या पोटी जास्त शोषली जातात. त्यामुळे नाश्त्याच्या 1 तास आधी किंवा 1 तासानंतर ते घेणे अधिक चांगले असते. यामुळे शरीराला जास्तीत जास्त जीवनसत्त्वे मिळतात. आरोग्य तज्ञांच्या मते, व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डी घेण्याची एक विशेष वेळ आहे. दिवसाच्या एकाच वेळी त्यांचे सेवन केल्यास शरीराला त्यांचा अधिक फायदा होऊ शकतो.

अस्वीकरण: बातम्यांमध्ये दिलेली माहिती ही सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. कोणतीही गोष्ट अंमलात आणण्यापूर्वी, संबंधित तज्ञाचा सल्ला घेतला गेला पाहिजे.

मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.