AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Relationship Survey : रिलेनशीप,लग्नाविषयी भारतीय स्त्रियांचे विचार काय? निष्कर्ष असे की, तुम्हाला ही बसेल धक्का

Relationship Survey : लग्न आणि रिलेशनशीपविषयी भारतीय स्त्रियांचे विचार काय? निष्कर्ष ऐकून बसेल धक्का

Relationship Survey : रिलेनशीप,लग्नाविषयी भारतीय स्त्रियांचे विचार काय? निष्कर्ष असे की, तुम्हाला ही बसेल धक्का
| Updated on: Jan 21, 2023 | 8:41 PM
Share

नवी दिल्ली : लग्न आणि रिलेशनशीप (Marriage And Relationship) सारख्या प्रकरणात प्रत्येक व्यक्ती फार गांभीर्याने विचार करतो. त्यानंतरच तो योग्य ते पाऊल टाकतो. भारतीय समाजात (Indian Society) लग्न हा संस्कार आणि पवित्र बंधन मानण्यात येते. परंतु, आता काळानुसार त्यात बदल दिसून येत आहे. आता अनेक तरुण-तरुणी लग्नापूर्वी भेटीगाठी घेतात. एकमेकांना वेळ देतात. समजून घेतात आणि नंतर पुढचा निर्णय घेतात. तर काही ठिकाणी अजूनही लग्नापूर्वी तरुण-तरुणीच्या भेटीला योग्य मानण्यात येत नाही. भारतीय परंपरेत या गोष्टींकडे पाहण्याचा कर्मठ दृष्टिकोन आहे.

लग्न आणि रिलेशनशीपविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. काही परंपरा आणि कर्मठ विचार आहेत. लग्न आणि रिलेशनशीपविषयी एक सर्व्हेक्षण करण्यात आले. सर्व्हेक्षणातील आकडेवारीवर नजर टाकली असता, त्याचे निष्कर्ष धक्कादायक होते.

या डिजिटल युगात जीवनसाथी निवडीसाठीही आता डिजिटल माध्यमांचाच वापर होत आहे. अनेकजण लग्नाविषयीचे अॅप्स, साईटचा अथवा सोशल डेटिंग साईटचा आधार घेत आहेत. यामधील एक डेटिंग अॅप बंबलने हा सर्वे पूर्ण केला. बंबलच्या आकडेवारीने अनेकांना धक्का बसला.

डेटिंग अॅपचा वापर करणाऱ्या जवळपास 39 टक्के लोकांना वाटते की, त्यांचे कुटुंबिय लग्न सराईत त्यांना लग्न करण्याची वा एखाद्या रिलेशनशीपमध्ये अडकण्याचा सल्ला देतात. या अॅपचा वापर करणाऱ्या जवळपास 33% अविवाहित तरुण-तरुणींना वाटते की, त्यांना लग्नासाठी बळीचा बकरा बनविल्या जात आहे. त्यांच्यावर दबाव आहे.

डेटिंग अॅप बंबलच्या आकडेवारीनुसार, भारतातील जवळपास 81 टक्के महिला लग्न न करताच खूश आहेत. त्यांना एकटे राहण्यात जास्त चांगले वाटते. या सर्वेत जवळपास 83 टक्के महिलांनी भावना व्यक्त केली की, त्यांना जोपर्यंत योग्य जोडीदार मिळत नाही तोपर्यंत त्या कोणत्याही नात्यात अडकू इच्छित नाही.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.