AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॅरेंटिगमध्ये कसे काम करते 7-7-7 नियम? जाणून घ्या पालन करण्याचे फायदे

मुलांना चांगल्या सवयी आणि व्यवहार शिकवण्यात पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. मुले 7 ते 14 वयात मुल खुप काही शिकतात, या वयात मुलं नवीन कौशल्ये, जगण्याची मुल्य, मैत्री आणि नवीन आवडी विकसित करतात. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीमध्ये हा टप्पा खूप महत्वाची भूमिका बजावतो. या लेखात आपण जाणून घेऊया की ७-७-७ नियम पालकत्वात कसा मदत करतो आणि त्याचे फायदे काय आहेत.

पॅरेंटिगमध्ये कसे काम करते 7-7-7 नियम? जाणून घ्या पालन करण्याचे फायदे
parenting
| Edited By: Jitendra Zavar | Updated on: May 12, 2025 | 3:05 PM
Share

मुलांच्या संगोपनात पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. जेव्हा पालकत्वाचा विचार येतो तेव्हा कोणतेही पॅरामीटर सेट करणे खूप कठीण होते. कारण प्रत्येकाची पालकत्वाची शैली वेगळी असते. यात काहीही बरोबर किंवा चूक नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मुलांची काळजी घेत असतात आणि शक्य तितके सर्वोत्तम प्रयत्न करतात. आजच्या या आधुनिक जगात पालकांनी अशा अनेक पद्धती वापरून पाहण्यास सुरुवात केली आहे ज्याद्वारे मुलांना सुरुवातीपासूनच भविष्यासाठी चांगले तयार केले जाऊ शकते. यापैकी एक पद्धत म्हणजे 7-7-7 नियम. याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे पण पालकत्वाची ही सर्वोत्तम पद्धत आहे.

हा नियम मुलांची वाढ आणि आयुष्य सुधारण्यास मदत करतो. या नियमाच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलाला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल आणि ती मूल तुमच्याशी सर्वकाही शेअर करू शकतील. चला तर मग जाणून घेऊया की हा 7-7-7 नियम काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत.

7-7-7 नियम काय आहे?

या नियमात मुलाच्या विकासाचे ३ भाग केले आहेत. याचा अर्थ असा की वयवर्ष 7 ते 21 पर्यंत मुले जे काही शिकतात, ते त्यांच्या आयुष्यात तसेच वागतात. या 7-7-7 नियमाचे पालन करून पालक आपल्या मुलांना जीवन कसे जगायचे ते शिकवू शकतात. हा नियम पालक आणि मुलांसाठी फायदेशीर आहे.

स्टेज-1

0 ते 7 वर्षे वयापर्यंत मुलांच्या लाईफ फोकस खेळावर असले पाहिजे. जसे काही खेळाच्या ॲक्टीव्हिटी कोणताही मजेदार खेळ, जो खेळल्याने त्यांचे मन तीक्ष्ण होते आणि ते गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतात.

स्टेज-2

पालकांनी मुलांचे वयवर्ष 7 ते 14 असलेल्या त्यांच्या मुलांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. कारण या वयात मुले मित्र बनवतात, त्यांना बरोबर आणि चूक यातील फरक सांगणे खूप महत्वाचे असते. या वयात तुम्ही मुलांना अनेक गोष्टी शिकवू शकता जसे की लोकांशी कसे बोलावे, समाजात तुमचे विचार कसे मांडावेत, नवीन कौशल्ये कशी शिकावीत, या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांना या वयात शिकवल्या पाहिजेत.

स्टेज-3

14 ते 21 वर्षे वय म्हणजे जेव्हा मुले किशोरावस्था आणि तारुण्याकडे जातात. या वयात तुम्ही मुलांच्या पालकांशी मैत्री केली पाहिजे जेणेकरून ते तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपवू शकणार नाहीत. या वयात मुले स्वतःहून निर्णय घेऊ लागतात, म्हणून तुम्ही त्यांना निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे परंतु त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही याकडेही लक्ष दिले पाहिजे. या टप्प्यात, मुलांना आत्म-नियंत्रण, आत्मविश्वास कसा वाढवायचा, बरोबर आणि चूक यात फरक कसा करायचा हे शिकवले पाहिजे कारण या वयात ते जे काही शिकतील ते इतरांशी त्याच पद्धतीने वागतील.

7-7-7 नियमाचे फायदे

मुलांच्या वाढीमध्ये हा नियम खूप महत्वाची भूमिका बजावतो. हे पालक आणि मुलांमधील भावनिक बंध सुधारते. या नियमाच्या मदतीने मुले जीवन जगण्याची एक नवीन पद्धत शिकतात आणि पालकांचा त्यांच्याबद्दलचा आदरही वाढतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय