AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी आहे अन्नपूर्णा जयंती? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व

अन्नपूर्णा जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते. यावर्षी अन्नपूर्णा जयंती कधी आहे आणि अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी काय करावे हे जाणून घेऊ.

कधी आहे अन्नपूर्णा जयंती? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 8:22 PM
Share

हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा देवीला विशेष महत्त्व आहे. अन्नपूर्णा जयंती ही अन्नपूर्णा देवीला समर्पित आहे. अन्नपूर्णा जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरातील ऐश्वर्य वाढते. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करून जीवनातील अनेक दुःख दूर होतात.

अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवास देखील केला जातो. अशी मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो आणि तिच्या कृपेने घरात अन्नधान्याची कमतरता होत नाही. जाणून घेऊया अन्नपूर्णा जयंती कधी आहे आणि अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी काय करावे?

कधी आहे अन्नपूर्णा जयंती? यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा 14 डिसेंबर रोजी दुपारी 4:58 ला सुरू होणार असून ही पौर्णिमा 15 डिसेंबर रोजी दुपारी 2:31 वाजता संपेल. यामुळे 15 डिसेंबर रोजी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाणार आहे.

अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी हे नक्की करा:

अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला.

यानंतर देवघर गंगाजल टाकून स्वच्छ करा.

या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल तर उपवास करण्याचा संकल्प करा.

देवघराच्या जवळ अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवा.

अन्नपूर्णा देवीच्या मूर्ती किंवा फोटो समोर धूप आणि दिवा लावा.

पूजेसाठी हळद, कुंकू, अक्षदा, नैवेद्य, तुळशीची पाने ठेवा.

नैवेद्यामध्ये शिरा, पुरी आणि भाज्या तयार करून ठेवा.

पूजा करताना अन्नपूर्णा देवीच्या स्त्रोतांचा आणि मंत्रांचा जप करा.

यासोबतच देवीला अक्षदा, फुले समर्पित करा.

पूजा संपल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना या प्रसादाचे वाटप करा.

पूजेमध्ये देवीचा मंत्र ‘ओम अन्नपूर्णाय नमः’ चा 108 वेळा जप करा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.