AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए…. गार पाण्याने अंघोळ केल्याने वाढू शकते प्रजनन क्षमता !

कोल्ड शॉवर म्हणजेच थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्ताभिसरण सुधारणे, प्रजनन क्षमता वाढणे असे आरोग्याचे अनेक फायदे मिळतात.

ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए.... गार पाण्याने अंघोळ केल्याने वाढू शकते प्रजनन क्षमता !
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 24, 2023 | 3:47 PM
Share

नवी दिल्ली : अंघोळ करणे (taking a bath) आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. दररोज आंघोळ करणे ही चांगली सवय त्यामुळे शरीरावरील मळ तसेच केस स्वच्छ होतात. आपल्याला ताजेतवानेही वाटते. काही लोकांना गार तर काहींना गरम पाण्याने अंघोळ करणे आवडते. पण हिवाळा असो किंवा उन्हाळा, आपण थंड (cold water shower) पाण्याने आंघोळ केली पाहिजे. हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करण्याचा विचार अनेक लोकांना विचित्र वाटू शकतो, परंतु ही पद्धत आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? एनसीबीआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, थंड पाण्याने आंघोळ करणे हे आपले आरोग्य आणि मन दोन्हीसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. तज्ञांच्या मते, यामुळे रक्ताभिसरण सुधारणे (improves blood circulation), प्रजनन क्षमता वाढणे (fertility) यासारखे अनेक आरोग्यासंदर्भातील अनेक फायदे आपल्याला मिळतात. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

प्रजनन क्षमता वाढते

आजकालच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आई किंवा वडील होऊ न शकण्याची समस्या बरीच सामान्य बनली आहे. पण थंड पाण्याने शॉवर घेतल्याने प्रजनन क्षमता वाढते आणि निरोगी लैंगिक जीवनही मिळते, असे अहवालात समोर आले आहे.

रक्ताभिसरण सुधारते

शरीरातील रक्ताभिसरण योग्य नसेल तर त्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. पण थंड पाण्याने आंघोळ करून रक्ताभिसरण सुधारू शकते.

आत्मशक्ती वाढते

थंडीच्या दिवसांत गार पाण्याने अंघोल करणे सर्वांना शक्य होत नाही. पण या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमची आत्मशक्ती देखील मजबूत करू शकता. तसंही आता लवकरच उन्हाळा येणार आहे, त्यामुळे थंड पाण्याने आंघोळ करा आणि निरोगी राहा.

तणाव कमी होतो

आपल्या सर्वांना माहित आहे की तणाव किंवा नैराश्यामागील मुख्य कारण म्हणजे खराब मानसिक आरोग्य. तणाव दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी योग, थेरपी किंवा इतर पद्धती वापरल्या जाऊ शकतात आणि थंड पाण्याचा शॉवर हा त्यापैकीच एक आहे.

सतर्कता वाढते

मन शांत करण्यासाठी थंड पाण्याची अंघोळ उपयुक्त ठरतेच. तसेच त्यामुळे शरीरात सतर्कता वाढते. हिवाळ्यात अंघोळ करताना थंडी जाणवते, पण शरीर सामान्य झाल्यावर दिवसभर ताजेतवाने राहते.

त्वचा आणि केस

थंडीपासून वाचण्यासाठी लोक खूप गरम पाण्याने अंघोळ करण्याची चूक करतात आणि त्याचा वाईट परिणाम त्वचेला आणि केसांना सहन करावा लागतो. त्वचेवर पुरळ आणि केस गळणे सुरू होऊ शकते. म्हणूनच दररोज थंड किंवा सामान्य पाण्याने आंघोळ करण्याची सवय लावा.

वजन कमी करण्यास उपयुक्त

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की थंड पाण्याने आंघोळ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमचा लुक सुधारू शकता.

टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी उपयुक्त

थंड पाण्याने आंघोळ करण्याचा एक फायदा म्हणजे ते आपल्यातील लव्ह हार्मोन टेस्टोस्टेरॉन वाढवण्याचे काम करते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.