AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : समाजात तुम्हाला मान हवा आहे? मग या गोष्टी कधीच विसरू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. माणसाने समाजात कसं वागलं म्हणजे समाज त्याचा आदर करेल याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

Chanakya Niti : समाजात तुम्हाला मान हवा आहे? मग या गोष्टी कधीच विसरू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 06, 2026 | 10:05 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात या समाजात दोन प्रकारचे लोक असतात, काही लोकांना आपल्या आयुष्यात प्रचंड मान-सन्मान मिळतो, लोक त्यांचा आदर करतात. लोक कायम अशा लोकांच्या मदतीसाठी पुढे असतात. परंतु त्याचसोबत समाजात असे देखील काही लोक असतात, ज्यांना त्यांच्या आयुष्यात कधीच मान-सन्मान मिळत नाही. अशा लोकांचा समाज कधीही आदर करत नाही, तसेच अशा लोकांची लवकर कोणी मदत देखील करत नाही. असं का होतं? तर तुमच्याकडे असलेल्या गुणांमुळे हे सर्व घडतं. त्यामुळे माणसाने नेहमी चांगले गुण आत्मसात केले पाहिजेत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेयात चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

आत्मसन्मान – चाणक्य म्हणतात प्रत्येक व्यक्तीने आपला आत्मसन्मान जपलाच पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या स्वत:विषयी आदर नसेल तर दुसरे लोक तुमचा कधीही आदर करणार नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला समजात सन्माने जगायचे असेल तर तुम्ही तुमचा आत्मसन्मान जपलाच पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

दिलेला शब्द पाळा – चाणक्य म्हणतात मानसाने काहीही करावं पण दिलेला शब्द पाळावा, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला एखादा शब्द दिला आहे, तर त्यासाठी तुम्हाला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण तुम्ही तुमचं आश्वासन हे पूर्ण केलंच पाहिजे, जेव्हा तुम्ही तुमचं आश्वासन पूर्ण करता, तेव्हा तुमच्याबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण होतो, आणि ते तुमचा आदर करू लागतात. समजामध्ये तुमचा आदर वाढतो

वेळ पाळा – चाणक्य म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाने नेहमी वक्तशीर असावं, जो व्यक्ती दिलेला शब्द आणि वेळ पाळतो, समाज त्याचा आदर करतो. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला एखादी वेळ दिली असेल तर ती वेळ पाळा, कधीही चुकवू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान