AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसात भिजल्याने सुटते सारखी खाज ? मग करा हा रामबाण इलाज

पावसात भिजल्यानंतर तुमच्याही हाता-पायाला, मानेला खाज सुटते का ? तीव्र खाजेचा त्रास होत असेल आणि त्यापासून सुटका हवी असेल तर एक उपाय नक्कीच गुणकारी ठरेल.

पावसात भिजल्याने सुटते सारखी खाज ? मग करा हा रामबाण इलाज
Image Credit source: freepik
| Updated on: Jul 08, 2023 | 3:32 PM
Share

Itching Remedies : पावसाळ्याच्या ऋतूत भिजल्यानंतर काही लोकांच्या शरीराला खूप खाज (itching problem) सुटते. ही खाज कधी कधी इतकी तीव्र असते की खाज सुटलेल्या ठिकाणी जखमाही तयार होतात. खरे तर या ऋतूत हवेतील आर्द्रता वाढल्याने खाज सुटते. याशिवाय घाम, (sweating) कपड्यांचा पोत यामुळेही खाज सुटू शकते. मान, चेहरा, हात, पायाचे तळवे आणि हाताखालील भागात म्हणजेच काखेत जास्त खाज येते.

बदलत्या हवामानामुळे होणारी ही खाज दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची क्रीम्स आणि लोशन लावण्याचा सल्ला दिला जातो. पण त्यानंतरही खाज सुटण्याची समस्या बरी होतेच असं नाही. तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल तर खाली नमूल केलेले घरगुती उपाय करून पहा, ज्यामुळे खाज सुटण्याच्या समस्येपासून त्वरित आराम मिळेल.

नारळाचे तेल

नारळाचे तेल किंवा खोबरेल तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्याचा वापर हा खाज, इन्फेक्शन आणि त्वचेवर पुरळ येण्याच्या समस्येपासून लवकर आराम देण्यासाठी गुणकारी ठरतो. याशिवाय खोबरेल तेल हे नैसर्गिक मॉयश्चरायझर देखील आहे. हे त्वचेमध्ये फिलाग्रिनचे प्रमाण वाढवते, ते एक प्रकारचे प्रोटीन आहे. त्यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो आणि पीएच संतुलनही राखले जाते.

खाज येण्याची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेलात थोडा कापूर मिसळून खाज येणा-या ठिकाणी लावा. लवकर आराम मिळण्यासाठी, रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी आंघोळीनंतर देखील हे तेल लावावे. खोबरेल तेल हे त्वचेच्या संसर्गासाठी सर्वात प्रभावी उपाय मानले जाते, त्याचा वापर अनेक शतकांपासून केला जातो

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत