AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Osmanabad : लाखोंची गर्दी अन् एकच मागणी, ‘या’ निर्णयावर मराठा समाजाचे मोर्चेकरी ठाम

आरक्षणाच्या मागणीसाठी उस्मानाबादसह मराठवाड्यातून समाजबांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. भर पावसात हा मोर्चा निघाल्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते.

Osmanabad : लाखोंची गर्दी अन् एकच मागणी, 'या' निर्णयावर मराठा समाजाचे मोर्चेकरी ठाम
कळंब येथील मराठा मोर्चामध्ये सहभागी झालेले मराठा समाज बांधव
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 19, 2022 | 3:23 PM
Share

उस्मानाबाद : मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून चर्चा आहे ती, (Kalamb) कळंब जि. उस्मानाबाद येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाची. (Reservation) आरक्षणाच्या मागणीसाठी या समाजाने यापूर्वीही (Silent front) मूक मोर्चे काढून देशाचे लक्ष वेधले होते. असे असतानाही समाजाला आरक्षण हे मिळालेले नाही. त्यामुळे पुन्हा हा समाज आक्रमक झाला असून मार्चाच्या माध्यमातून आपल्या मागण्या मांडल्या जाणार आहेत. कळंब येथे पार पडलेल्या मोर्चामध्ये भर पावसात लाखो समाजबांधवांनी हजेरी लावली होती. तर मुस्लिम समाज बांधवांनी केवळ पाठिंबाच दर्शवला नाही तर मोर्चामध्ये सहभागी असणाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब या तालुक्याच्या ठिकाणी मराठा समाजाचा मोर्चा निघाला होता. आरक्षणाच्या मागणीसाठी उस्मानाबादसह मराठवाड्यातून समाजबांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. भर पावसात हा मोर्चा निघाल्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते.

आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा पुढे करीत मराठा समाज पुन्हा आक्रमक होत आहे. आता 2 दिवसांचे विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मोर्चेकरांनी केली आहे. त्यावर सरकार काय निर्णय घेणार हे देखील पहावे लागणार आहे.

आरक्षणबाबत मराठा समाजाच्या पदरी केवळ आश्वासनाशिवाय काहीच पडलेले नाही. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, असा सूर मराठा समाजबांधवांचा आहे. जर सरकारने वेळकाढूपणा केला तर मात्र, नो आरक्षण नो व्होट अशीच भूमिका घेतली जाणार आहे.

यापूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी सबंध राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी मूक मोर्चे निघाले होते. शिवाय आरक्षणाची मागणी करीत काही तरुणांनी आत्महत्या देखील केल्या होत्या. त्यामुळे आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नसल्याचे समाजाचे म्हणणे आहे.

कळंबसारख्या तालुका ठिकाणच्या शहरात हा मोर्चा पार पडला. पाऊस सुरु असतानाही मोर्चेकरांनी माघार घेतली नाही. तर मुस्लिम समाज बांधवांनीही मोर्चाला पाठिंबा तर दर्शवलाच पण सहभागी असणाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...