AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती मुले भ्रष्टाचार करतील की… वांगचुक यांच्या त्या व्हिडिओवर अभिजीत दिपकेंचे मोठे विधान

Abhijit Dipke : सोनम वांगचुक यांनी अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याबाबत मोठे विधान केले होते. आता यावर अभिजीत दिपके यांनी भाष्य केले आहे.

ती मुले भ्रष्टाचार करतील की... वांगचुक यांच्या त्या व्हिडिओवर अभिजीत दिपकेंचे मोठे विधान
Abhijit Dipke on Wangchuk statementImage Credit source: Google
| Updated on: Aug 30, 2026 | 7:43 PM
Share

सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) शी संबंधित तीन प्रमुख नेते अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याबाबत मोठे विधान केले होते. एका पॉडकास्टमध्ये वांगचुक यांनी म्हटले होते की, या नेत्यांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा आहे आणि भविष्यात ते भ्रष्ट होणार नाहीत, याची कोणतीही हमी देता येणार नाही. मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केले की राजकीय महत्त्वाकांक्षा असणे ही स्वतःमध्ये चुकीची गोष्ट नाही. आता वांगचुक यांच्या या विधानावर अभिजीत दिपके यांनी भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यांना सोनम वांगचुक यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना दिपके यांनी म्हटले की, सोनम वांगचुक म्हणाले ही मुलं भ्रष्टाचार करतील असं वाटत नाही. मुलांनी आतापर्यंत केलेलं काम चांगलं आहे असं ते म्हणाले. तुम्ही एडिटेड क्लिप बघू नका.’

नेमकं काय म्हणाले होते वांगचुक ?

सोनम वांगचुक म्हणाले होते की, ‘या लोकांचा राजकीय पक्षाशी जोडलेला भूतकाळ राहिला आहे. सुरुवातीला काही लोकांकडून हे प्रश्न उपस्थित केले जात होते की, हे लोक नेमके कुठून आले आहेत? त्यांनी सांगितले की, हे लोक यापूर्वी आम आदमी पक्षाशी जोडलेले होते. मात्र, वांगचुक यांनी स्पष्ट केले की, एखाद्या व्यक्तीच्या राजकीय भूतकाळाबाबत ते फारसे प्रश्न उपस्थित करत नाहीत. कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेले असणे हे स्वतःमध्ये चुकीचे नाही.

राजकीय महत्त्वाकांक्षा आहे…

वांगचुक यांना विचारण्यात आले की, या नेत्यांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा आहे का? यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. सोनम वांगचुक म्हणाले की, जेव्हा त्यांनी या लोकांना जवळून पाहिले आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्यामध्ये राजकीय महत्त्वाकांक्षेची चिन्हे दिसून आली. मात्र यामध्ये काहीही गैर नाही. ते काही संत नाहीत की, ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आहे आणि त्यांना राजकारणातून काहीही मिळवण्याची इच्छा नाही. त्यामुळे भविष्यात ते भ्रष्ट होणार नाहीत, याची कोणतीही हमी देता येणार नाही. राजकीय महत्त्वाकांक्षा असणे स्वाभाविक आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही.

Follow Us
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, युट्यूब चॅनलवर गुन्हा
Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले;
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले; नेमकं कारण...
एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
Eknath Shinde Melava Rada | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी?
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी? प्रताप सरनाईक म्हणाले ...
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान,
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?