AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मराठी मुद्दा होता है क्या, फालतू बाते करते है…’, अबू आझमी नेमकं काय म्हणाले?

राज्यात सध्या मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे, यावर आता सपा नेते अबू आझमी यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे.

'मराठी मुद्दा होता है क्या, फालतू बाते करते है...', अबू आझमी नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 22, 2025 | 2:54 PM
Share

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयानंतर मराठी भाषेचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे, पहिलीपासून हिंदी भाषा नको यासाठी जोरदार विरोध होत आहे. वातावरण चांगलंच तापलं आहे. याविरोधात मनसे मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे. यावर  प्रतिक्रिया देताना आता सपा नेते अबू आझमी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मराठी क्या मुद्दा होता है क्या, फालतू बाते करते है’ महाराष्ट्रात राहतात ते सर्व मराठीवर प्रेम करतात. कोणाचीच मराठी सोबत नफरत नाही. एक भाषा अशी असली पाहिजे कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत याचा सन्मान झाला पाहिजे. एक राज्यातल्या भाषेचाही सन्मान झाला पाहिजे,’ असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले अबू आझमी?

‘मराठी क्या मुद्दा होता है क्या, फालतू बाते करते है’ महाराष्ट्रात राहतात ते सर्व मराठीवर प्रेम करतात. कोणाचीच मराठी सोबत नफरत नाही. एक भाषा अशी असली पाहिजे कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत याचा सन्मान झाला पाहिजे. एक राज्यातल्या भाषेचाही सन्मान झाला पाहिजे, असं आझमी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  संसदेत एक कमिटी आहे भाषेच्या नावावर 45 मेंबर आहेत ते भारतभर जाऊन हिंदीतून काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात. केंद्र सरकारचे पूर्ण काम हिंदीतून असतं. महाराष्ट्रात जर तीन भाषा असतील तर सगळ्यात पहिल्यांदा मराठी असली पाहिजे. दुसरी भाषा हिंदी आणि त्यानंतर इंग्लिश असायला पाहिजे. महाराष्ट्रात जर तिसरी भाषा हिंदी नसेल तर तुम्हीच सांगा कोणती भाषा पाहिजे? असा सवालही यावेळी आझमी यांनी उपस्थित केला आहे.

मनसे, ठाकरे गट युतीच्या चर्चेवर प्रतिक्रिया 

दरम्यान सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे, यावर देखील आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एकाच घरात जन्माला आले असतील तर सोबत राहातील, त्यात आम्हाला आनंद आहे. राज ठाकरेंची काही ताकद नाही, ते फक्त नफरतचं राजकारण करतात. दररोज  उत्तर भारतीयांविरोधात आणि हिंदी विरोधात बोलणं हाच त्यांचा धंदा आहे, अस आझमी यांनी म्हटलं आहे.

संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!.
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं.
... म्हणून कोणी दात तोडत नाही! मोहन भागवत याचं मोठं वक्तव्य
... म्हणून कोणी दात तोडत नाही! मोहन भागवत याचं मोठं वक्तव्य.
गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल
गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल.
सगळ्यांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव! मोहन भागवतांचं वक्तव्य
सगळ्यांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव! मोहन भागवतांचं वक्तव्य.
बांगलादेशला मदत कशासाठी? संजय राऊत यांचा सरकारला सवाल
बांगलादेशला मदत कशासाठी? संजय राऊत यांचा सरकारला सवाल.
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मुळच्या काँग्रेसच्या! राऊतांचं मोठं विधान
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मुळच्या काँग्रेसच्या! राऊतांचं मोठं विधान.
आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला! राऊतांचा दावा
आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला! राऊतांचा दावा.
मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे; ठाकरेंची माघार
मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे; ठाकरेंची माघार.
भारत-अमेरिका व्यापार करार नेमका काय? जाणून घ्या सोप्या शब्दात
भारत-अमेरिका व्यापार करार नेमका काय? जाणून घ्या सोप्या शब्दात.