AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर गद्दारांनी पळताना विचार केला असता, आदित्य ठाकरे यांची गायकवाड यांच्यावर टीका

आज नाशिकला येताना बघितले की पेट्रोल पंप बंद झाले होते. काल परवा देखील अंबादास दानवे यांनी ट्विट केले होते. कुठे भांडणे होत आहेत. कुठे मारामाऱ्या होत आहेत, रांगा लागल्या आहेत.- सरकारमध्ये असून जर तुम्हाला माहिती नसेल तर काय उपयोग असाही सवाल आदित्य यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानावर केला आहे.

...तर गद्दारांनी पळताना विचार केला असता, आदित्य ठाकरे यांची गायकवाड यांच्यावर टीका
MLA Sanjay Gaikwad and Aditya Thackeray
| Updated on: May 24, 2026 | 11:23 PM
Share

संजय गायकवाड यांनी शिवरायांचा इतिहास वाचला असता तर शिवाजी महाराजांनी गद्दारांना काय सजा दिली होती हे कळले असते. या गद्दारांना पळतानाही हजारदा विचार करावा लागला असता अशी टीका शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर केली आहे. सत्ताधाऱ्यांनी डोकं थाऱ्यावर ठेवून देशात आणि राज्यात काय परिस्थिती आहे. रोजगार किती आहेत? सरकारमुळे रुपयाची काय परिस्थिती झाली आहे. या सरकारमुळे शहरांची काय अवस्था झाली ? पाण्याची किती कमतरता आहे, रेस्टॉरंट बंद होत आहेत. छोटे-मोठे उद्योगांचे काय हाल सरकारने केले आहे याचा विचार करावा, अन्यथा लोकच यांना पळवून लावतील अशीही टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

कुंभमेळ्यासाठी कोणाचाही विरोध नाही. नाशिकला काही फायदा आहे का ? हा एक प्रश्न उपस्थित होतो.जिथे खोदकाम सुरू आहे, तेथे पावसाळा सुरू झाल्यानंतर नाशिककरांना याचा त्रास होईल का ? याचा विचार सरकारने केला पाहिजे. आपली जी रुपयाची परिस्थिती झाली आहे,त्याचे परिणाम आपण भोगत आहोत. सरकार आपल्याला आश्वासन देऊ शकते का ही कामे पेमेंट होत नसल्यामुळे थांबणार नाहीत, कॉन्ट्रॅक्टर काम सोडून जाणार नाहीत याची खात्री सरकार घेईल का ? अनेक कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळत नाही त्यांचे काय होणार असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

नाशिक (रिंगरोड आणि कुंभमेळा प्रकल्प) येथे भूसंपादनासाठी शेतकरी महिलेला घरात घुसून मारहाण झाली होती. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की राऊत साहेबांनी तो विषय घेतला होता, एका महिलेला मारहाण केली घरी जाऊन, अधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. शेतकरी कधीही चांगल्या कामाला विरोध करीत नाहीत. पण शेतकऱ्यांना नीट विचारात घेतले पाहिजे असेही ठाकरे यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत तेथून ते दरेगावला जातील अशीही टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. विधान परिषदेच्या १७ जागांवर होऊ घातलेल्या निवडणूकांसंदर्भात पक्षाची भूमिका उद्धव साहेब जाहीर करतील.चांगले आहे मी बाहेरच्या पाच देशांचा दौरा तर केला नाही असा टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला.

कॉक्रोच पार्टीची यांना भीती किती

भाजपा सरकार जसे इतर पार्टीच्या मागे लागतात तसे या पार्टीच्या मागे लागले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया पेजला भाजपच्या सरकारला बॅन करावसे वाटले, म्हणजे विचार करा भीती किती वाटत असेल.यांच्या विरोधात कोणी बोललं तर पाकिस्तानसोबत संबंध जोडतात आणि हे पाकिस्तान सोबत सेमी फायनल खेळतात असाही टोमणा आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल