ग्रामपंचायतीत घवघवीत यश, ठाकरे गटावर मात केल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Grampanchayat Election Result | ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालय. 2359 ग्रामपंचायतींपैकी भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसची मोठी पिछेहाट झालीय. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ग्रामपंचायतीत घवघवीत यश, ठाकरे गटावर मात केल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
CM Eknath Shind-Uddhav thackeray
Follow us
| Updated on: Nov 06, 2023 | 4:21 PM

मुंबई : “ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिलाय. मी मतदारांचे आभार मानतो. महाविकास आघाडीने जी काम थांबवलेली, प्रकल्प रोखलेले त्याला आम्ही चालना देण्याच काम केलं. राज्याच्या सर्वांगीण विकासाच धोरण आम्ही आखलं. या राज्यातील सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्यापासून उद्योजकापर्यंत तरुण, ज्येष्ठ नागरिक, भगिनी या सगळ्यांना न्याय देण्याच काम आमच्या सरकारने केलं” अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामपंचायत निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. यात शिंदे गटाने बऱ्यापैकी यश मिळवलय. ठाकरे गटावर मात केलीय. “शासन आपल्या दारी खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलय. कृतीतून मतदारांनी हे दाखवून दिलं. आपलं प्रेम व्यक्त केलं. महाविकास आघीडापेक्षा कितीतरी पटीने अधिक सरपंच, सदस्य महायुतीचे निवडून आले. म्हणून मी मनापासून राज्यातील जनतेचे आभार मानतो” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आपपल्यापरीने लोकाभिमुख काम करण्याचा, जनतेला न्याय देण्याच काम आम्ही केलं” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “काहींनी फक्त आरोप, प्रत्यारोप आणि टोमणे यामध्ये वर्ष घालवलं. वर्षातला एकही दिवस टिका, टिप्पणी करण्याची संधी सोडली नाही. लोकांनी त्यांना नाकारलं” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांचा रोख संजय राऊत यांच्याकडे होता. जे रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधत असतात.

‘त्यांना घरी बसायची सवय होतीच’

“ज्या लोकांनी मतदारांशी प्रतारणा केली, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. त्यांना जनतेने घरी बसवलं, त्यांना घरी बसायची सवय होतीच” असा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोमणा मारला. “आमच्यावर मतदारांच प्रेम आहे, मतदारांचे विश्वास आहे. आमची जबाबदारी वाढली आहे. आणखी काम करुन विकास करु. उद्योगधंदे आणून तरुणांना स्वत:च्या पायावर उभं करु. विकासाला आणखी चालना देऊ” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “आधीच्या अडीच वर्षातील कामगिरी लोकांनी पाहिली, घरी बसून राज्य चालवता येत नाही हे लोकांनी दाखवून दिलं” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.