AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या आमदाराने केला ‘जय महाराष्ट्र’

शिंदे गटाला आता कमी मंत्रीपदे मिळणार असल्यामुळे शिंदे गटातील काही आमदार नाराज झाले आहेत. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या आमदाराने 'सर्व झाले, आता जय महाराष्ट्र' अशा शब्दात जाहीर नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या आमदाराने केला 'जय महाराष्ट्र'
CM WITH DCM DEVENDRA AND AJITDADA Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 04, 2023 | 3:03 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या दोन पक्षाचे सरकारमध्ये केवळ वीस मंत्री होते. त्यामुळे काही नाराज आमदारांची मनधरणी करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश मिळाले होते. मात्र, आता राष्ट्रवादी पक्ष सरकारमध्ये सामील झाल्याने नाराज आमदारांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता शिंदे गटाला 9 आणि भाजपला 9 मंत्रीपदे देण्यात आली होतो. तर राष्ट्रवादीच्याही अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता उरलेल्या मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही प्रामाणिकपणे आलो. आम्हाला वाटलं नव्हतं की राष्ट्रवादी आमच्याबरोबर येईल. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला ‘ते’ जॉईंट होतील असे वाटले नव्हते. त्यामुळे आमचा हिस्सा कमी झाला ते नसते तर आमच्या सर्वांची इच्छा पूर्ण झाली असती. मात्र, आता काही लोकांना थांबावे लागेल. नाराज होऊन आता काय करणार जे आहे त्याला सामोरे गेले पाहिजे अशी नाराजी शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी व्यक्त केलीय.

आम्हाला भाकरी खायची होती. पण आता काही जणांना अर्धी भाकर मिळणार. ज्याला अर्धी मिळणार होती त्याला पाव भाकरी मिळणार. आता जे समोर येईल ते पाहू त्याला सामोरे जावे लागेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जे निर्णय घेतले तो देशहितासाठी राज्यहितासाठी घेतला आहे. तो स्वीकारणे क्रमप्राप्त आहे असेही त्यांनी सांगितले.

‘आता सर्व झाले, आता जय महाराष्ट्र’

भाजपचे हे ऑपरेशन सुरू होते म्हणून आम्हाला थांबवले होते. आता ते ऑपरेशन सक्सेस झाले. आता आम्हाला कळलं की राष्ट्रवादीवाले येणार होते म्हणून आम्हाला थांबवण्यात आले होते. त्यावेळी पहिल्या नऊमध्ये आम्ही होतो. त्यावेळी काही कारणामुळे थांबलो आता आमचा नंबर लागेल. मंत्रिमंडळ विस्तार या आठवड्यात व्हायला हवा. ‘आता सर्व झाले, आता जय महाराष्ट्र’, असे भरत गोगावले म्हणाले.

घाबरणारी मंडळी नाही

राष्ट्रवादीवाले आमच्याबरोबर आले आहेत त्यामुळे त्यांनी आता आमच्या बाजूला बसायला पाहिजे. मुख्यमंत्री आमचे आहेत, देवेंद्रजी आहेत त्यामुळे काळजी करायचे आम्हाला कारण नाही. उद्धव साहेब होते त्यावेळची बाब वेगळी होती आताची बाब वेगळी आहे. कुणी कोर्टात गेले किंवा आणखी कुठे गेले त्यांना काय करायचे ते करू द्या. जे काही येईल त्याला आम्ही सामोरे जाऊ. आम्ही घाबरणारी मंडळी नाही त्यामुळे त्याची चिंता करायची गोष्ट नाही असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....