AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनो… 70 ते 100 मीमी पाऊस पडेपर्यंत चाड्यावर मुठ ठेवू नका, कृषीमंत्र्यांचं आवाहन; घरचं बियाणं वापरण्याचाही सल्ला

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना, जो पर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही. तो 70 ते 100 मी मी पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका असेही आवाहन कृषीमंत्री भुसे यांनी केलं आहे.

शेतकऱ्यांनो... 70 ते 100 मीमी पाऊस पडेपर्यंत चाड्यावर मुठ ठेवू नका, कृषीमंत्र्यांचं आवाहन; घरचं बियाणं वापरण्याचाही सल्ला
कृषीमंत्री दादा भुसेImage Credit source: tv9
| Updated on: Jun 16, 2022 | 7:01 PM
Share

मुंबई : कृषी विद्यापीठ (Agriculture University) शेतकरी हितासाठी आहे. तर कृषी विज्ञान केंद्राचंही काम आहे. त्यामुळे शेतकरी (Farmers) हिताच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या केंद्रांनी काम करावं. तर जो पर्यंत शेतीकरण्या योग्य पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. 70 ते 100 मीमी पाऊस पडेपर्यंत चाड्यावर मुठ ठेवू नका, असे आवाहन राज्यातील शेतकऱ्यांना कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी केलं आहे. तर यंदाच्या उशिरा सुरू होणाऱ्या पावसावर बोलताना त्यांनी, भौतिक बदल झाल्यामुळे पाऊस उशीरा येताना दिसत असल्याचे म्हटलं आहे. यावेळी भुसे यांनी, वेध शाळेच्या अंदाजानूसार 97 ते 103 टक्के पाऊस पडेल असे सांगण्यात येत होते. मात्र भौतिक बदल झाल्यामुळे पाऊस उशीरा येताना दिसत असल्याचे म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना, जो पर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही. तो 70 ते 100 मी मी पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका असेही आवाहन कृषीमंत्री भुसे यांनी केलं आहे.

शेतकरी हिताच्या योजना

त्याचबरोबर गावपातळीवर ज्या समिती स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यांनी शेतकरी हिताच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावं असेही त्यांनी म्हटलं आहे. तर गावच्या परिसरात किती पाऊस पडतो याची चर्चा होतं असते. त्याप्रमाणे होईलच असं नाही. त्यासाठी आधीपासूनच तयार रहायला हवं असेही ते म्हणाले. तर तालुका स्तरावर किती बियाणं, खतं लागणार याचा आढावा आमदार, पालकमंत्री यांच्याकडून घेण्यात आला होता असेही ते म्हणाले. तर याबाबत महसूल विभाग पातळीवर आपण स्वतः आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

घरची बियाणं वापरा

तसेच संपूर्ण राज्यासाठी बियाणं रासायनिक खते याचं प्रत्येक जिल्हानुसार नियोजन करण्यात आलं आहे. तर त्याची कमी पडणार नाही याची तयारी करण्यात आली आहे असेही कृषीमंत्री भुसे यांनी म्हटलं आहे. तर सध्या सोयाबीन आणि कापूस ही दोन महत्वाची पिकं असून त्यासाठी घरची बियाणं वापरावं असेही त्यांनी सांगितलं आहे. तर ही मोहिम आपण राबवत असून 60 टक्के क्षेत्र हे सोयाबीन आणि कापूस या पिकाखाली असल्याचेही कृषीमंत्री भुसे यांनी सांगितलं.

1 जुलैपासून कृषी सप्ताह

पुढील तीन वर्षासाठी 1 हजार कोटी रुपयेंची जी घोषणा करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तर क्लस्टर प्रोजेक्ट आपण राबविणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. तसेच 1 जुलैपासून कृषी सप्ताह राबविणार. मागच्या वर्षीच्या तुलनेत दीड टक्के पेरणी ही राज्यात झाली असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. तर विधानपरिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकू असा त्यांनी विश्वास दाखवला आहे. तर कुठलाही घोडेबाजार होणार नाही. तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार असल्याचेही कृषीमंत्री भुसे यांनी सांगितलं.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.