AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहिल्यानगरात एसटी बसचा भीषण अपघात, 1 ठार 15 जण जखमी, समोर कार आल्याने…

शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.राज्य परिवहन महामंडळ बस आणि एर्टिगा कार यांच्यात हा अपघात घडला. या अपघातात एक जण ठार तर 15 जण जखमी झाले आहेत.

अहिल्यानगरात एसटी बसचा भीषण अपघात, 1 ठार 15 जण जखमी, समोर कार आल्याने...
bus accidentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 31, 2026 | 4:59 PM
Share

ST Bus Accident : अहिल्यानगरात शिर्डी-नाशिक महामार्गावर एसटी बस आणि एर्टिगा कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. अवघ्या काही सेकंदांत झालेल्या या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तब्बल 15 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे अहिल्यानगरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. राज्य परिवहन महामंडळ बस आणि एर्टिगा कार यांच्यात हा अपघात झाला आहे. अपघातात एक जण ठार तर 15 जण जखमी झाले आहेत. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. तर एसटी बसचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात एवढा भीषण होता की कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात दोन्ही वाहनांमधील एकूण 15 जण जखमी झाले आहेत.

जखमी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल

शिर्डी जवळील सावळीविहीर हद्दीत अपघाताची ही घटना घडली आहे. अपघातग्रस्त बस पनवेलवरून शिर्डीला जात होती.  तर अपघातग्रस्त कार नाशिकला जात होती. अपघात झाल्याचे समजताच स्थानिकांनी तसेच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात साथ दिली.

दोन्ही वाहनं वेगात

हा अपघात एवढा भीषण होता की यात कारचा जागीच चक्काचूर झाला आहे. कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाल्याने ती कार खूप वेगात असावी, असा अंदाज लावला जात आहे. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. तत्पुर्वी जखमींवर उपचार केले जात असून मृतांचा आकडा वाढतो की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

वाहन चालवताना काय काळजी घ्यावी?

दरम्यान, वाहतुकीचे नियम न पाळल्याने तसेच वाहने चालवताना दुर्लक्ष केल्यानेच अशा प्रकारचे अपघात होतात. त्यामुळे प्रवाशांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. तसेच वाहने सावकाश चालवावीत. घाईत वाहन चालवल्यानेही अनेकदा अपघात होतो, असे सांगितले जात आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा