AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या खात्यात 15 लाख आले का? अजित पवारांचा मोदी सरकारला सवाल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 लाख रुपये आलेले नाहीत. ते आले असते तर शेतकरी सुखी झाले असते, असं म्हटलंय. (Ajit Pawar Narendra Modi)

शेतकऱ्यांच्या खात्यात 15 लाख आले का? अजित पवारांचा मोदी सरकारला सवाल
अजित पवार, मुख्यमंत्री
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Feb 08, 2021 | 7:03 PM
Share

अमरावती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 लाख रुपये आलेले नाहीत. ते आले असते तर शेतकरी सुखी झाले असते, असा टोला मोदी सरकारला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख 15 कोटी रुपये पाठवल्याचं सांगितलं होते. त्यावर बोलताना अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे. अजित पवार अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते. (Ajit Pawar raised question on Narendra Modi 2014 election promise of 15 lakh rupees )

अजित पवार काय म्हणाले?

आता पर्यंत 1 लाख 15 हाजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी सांगितलय.पण अजून पर्यंत लोकांच्या खात्यात 15 लाख आले नाही. मोठ्या लोकांनी असे काही वक्तव्य केल्यावर बाकी लोकांना वाटते की पैसे आले. जर 15 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आले असते तर शेतकरी समाधाही झाला असता, असं वक्तव्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावतीमध्ये केले.

आज शेतकरी समाधानी दिसतो का? शेतकरी आज संकटात आहे. अडलेल्या नडलेल्या परिस्थीत तो जीवन जगतोय. मात्र, त्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळणं हा त्यांचा हक्क आहे, असंही अजित पवार म्हणाले. शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी 50 ते 60 वर्षांचा संबंध आहे. त्यांनी कायम गरिबांची बाजू घेतली आहे, असंही अजित पवार म्हणाले.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना त्यांच्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. 2014 नंतर काही परिवर्तन केले, पीक विमा योजना वाढवली, जेणेकरुन छोटे शेतकरी त्याचा फायदा घेऊ शकतील, गेल्या चार -पाच वर्षात पीक विमा योजनेअंतर्गत 90 हजार कोटी रुपयांचा क्लेम शेतकऱ्यांना मिळाला. ही रक्कम कर्जमाफीपेक्षा मोठी होते, असं नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पाठवली. दहा कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. बंगालचे शेतकरी जर यात जोडले गेले असते तर हा आकडा मोठा असता. आतापर्यंत 1 लाख 15 हजार कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगतिलं. 10 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ दिला. बंगालचं राजकारण आडवं आलं नसतं तर हा आकडा मोठा असता, छोट्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आणली, आम्ही पहिल्यांदाच किसान रेल्वे आणली, याचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना झाल्याचा दावा मोदींनी केला.

संबंधित बातम्या:

रावसाहेब दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन, केंद्रानं हटवादी भूमिका सोडावी- अजित पवार

“ग्रामपंचायतीला दोन गट उभे राहतात; निवडून येतो, तो म्हणतो दादा आम्ही तुमचे” अजितदादांनी हशा पिकवला

(Ajit Pawar raised question on Narendra Modi 2014 election promise of 15 lakh rupees )

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...