AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संस्था चालवण्यासाठी प्रमुख कोण हे महत्त्वाचं, शिवराम भाऊंनी तळहाताच्या फोडासारखं बँकेला जपलं, अजित पवारांकडून उजाळा

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चक्रीवादळ, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व मदत आणि पुनर्वसनाचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री काय घोषणा करणार, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

संस्था चालवण्यासाठी प्रमुख कोण हे महत्त्वाचं, शिवराम भाऊंनी तळहाताच्या फोडासारखं बँकेला जपलं, अजित पवारांकडून उजाळा
ajit pawar
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 1:24 PM
Share

सिंधुदुर्गः कुठलिही संस्था चालवणारा प्रमुख कोण असतो, यावर तिचे यशापयश अवलंबून असते. शिवराम भाऊंनी तळहाताच्या फोडासारखं बँकेला जपलं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पवार डीपीडीसी बैठकीसाठी आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आले असताना बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जोरदार टोले हाणले.

काय म्हणाले पवार?

अजित पवार यांनी सुरुवातीला सर्वांना नवीन वर्षाच्या आणि नाताळच्या शुभेच्छा दिल्या. आपण डीपीडीसी आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. शिवराम भाऊ जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकाराचे मोठे काम करून ठेवले आहे. त्यांच्याशिवाय या जिल्ह्याचा इतिहास लिहिताच येणार नाही. हेच ध्यानात घेता यावेळी अजित पवारांनी शिवराम भाऊ जाधवांच्या कार्याला उजाळा दिला. ते म्हणाले, शिवराम भाऊंनी तळहाताच्या फोडासारखं बँकेला जपलं. कुठली संस्था चालवायची असेल, तर त्याचा प्रमुख कोण याला महत्त्व असतं. किंवा पाठिशी कोण राहणार याला ही महत्त्व असतं, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

राणेंना टोला

अजित पवार म्हणाले की, बँक ही त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक नाडी म्हणून ओळखली जाते. खरे तर इथे पीक कर्ज इथे कमी दिलं जातं. मात्र, आमच्याकडं हजारो कोटी दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार म्हणाले की, पूर्वी सतीश सावंत यांच्या मागे असणारी मंडळी काय काय काम सांगायची. तसं नसतं, बँक ही बँक असते, असे म्हणत त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला हाणला. शिवाय फार विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पहिलाच दौरा

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत गृहराज्य मंत्री सतेज पाटील देखील उपस्थित होते. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी या दोघांचेही विमानतळावर स्वागत केले. राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत व महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही यावेळी मंत्र्यांचे स्वागत केले. अजित पवार यांचा हा पहिलाच सिंधुदुर्ग दौरा आहे. ते यावेळी जिल्हा मुख्यालयातील डीपीडीस सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा घेणार आढावा आहेत.

घोषणांकडे लक्ष

डीपीडीसी बैठकीसोबत जिल्ह्यातील कोविड 19 विषाणू प्रादुर्भाव व उपाय योजनांचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. जिल्ह्याचे चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व मदत व पुनर्वसनाचा देखील घेणार आढावा यावेळी घेण्यात येणार असल्याचे समजते. बैठकीला पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री या दौऱ्यात काय घोषणा करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्याः

Salman Khan : सलमान खानला सापानं केला दंश; पनवेलच्या फार्महाऊसमधली घटना

मांडवलीसाठी नाशिकमध्ये उद्योजकाला मागितली 2 कोटींची खंडणी; भूमाफियाची तुरुंगातून उठाठेव

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.