AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं काम नेमकं कुठवर आलंय?

मुंबई ते नागपूरपर्यंतचा 710 किलोमीटर लांबीचा, सहा पदरी हा समृद्धी महामार्ग आहे.

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं काम नेमकं कुठवर आलंय?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Dec 05, 2020 | 1:05 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज अमरावती आणि औरंगाबादचा दौरा करत आहेत. उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray ) हा दौरा महत्त्वाचा आहे. कारण या दौऱ्यात ते बहुचर्चित बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) कामाची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री मुंबईतून नागपूर विमानतळावर जातील, तिथून ते अमरावती आणि मग औरंगाबादला जातील. मुख्यमंत्री आपल्या या दौऱ्यात दोन्ही जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणार आहेत. (All about to know Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg)

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मार्गाला ठाकरे सरकारने आधीच स्वर्गीय बाळासाहेबांचं नाव दिलं आहे. यावरुनही मोठं राजकारण रंगलं. “ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार आहे. या महामार्गाला केवळ बाळासाहेबांचं नाव दिल्यानेच महामार्गाचं काम सुरु आहे, अन्यथा सर्व कामांना या सरकारने स्थगिती दिली आहे”, असा आरोप भाजपने नेहमीच केला आहे.

समृद्धी महामार्ग

राज्यात मोठा गाजावाजा झालेला मुंबई ते नागपूरपर्यंतचा 710 किलोमीटर लांबीचा, सहा पदरी हा समृद्धी महामार्ग आहे. एकूण 10 जिल्हे, 27 तालुके आणि 392 गावातून हा महामार्ग जाणार आहे. सुरुवातीला म्हणजे चारवर्षापूर्वी साधारण 40 हजार कोटींचा हा प्रकल्प होता. आता त्याची किंमत 56 हजारा कोटींच्या पुढे गेली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात म्हणजेच 7 सप्टेंबर 2016 रोजी या महामार्गाची अधिसूचना काढण्यात आली. नागपूर ते मुंबईपर्यंतचा हा समृद्धी महामार्ग भारतातील पहिला आणि जगातील तिसरा सर्वात मोठा महामार्ग आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातल्या नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा,जालना औरंगाबाद,अहमदनगर,नाशिक ठाणे या दहा जिल्ह्यातून जाणार आहे.

एकूण 710 किलोमीटर लांबीचा असलेला हा रस्ता तयार झाल्या नंतर नागपूर मुंबई हे अंतर फक्त 6 तासात कापणे शक्य होणार आहे. या महामार्गावरुन वाहने ताशी दीडशे किमी वेगाने धावू शकतात.

कसा आहे समृद्धी महामार्ग?

  • नागपूर ते मुंबई 710 किमी पर्यंतचा महामार्ग
  • एकूण 120 मीटर रुंदीचा हा रस्ता 6 पदरी असणार
  • एकूण 10 जिल्हे, 27 तालुके आणि 392 गावातून महामार्ग जाणार
  • नागपूर मुंबई हे अंतर फक्त 6 तासात कापणे शक्य
  • वाहने ताशी दीडशे किमी वेगाने धावू शकणार
  • शंभर फुटांवर डिव्हायडर
  • इमर्जन्सी विमानाचं लँडिंग करण्याचीही सुविधा

गडकरींची संकल्पना, ठाकरेंचा महत्वाकांक्षी प्रकल्प

नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाची मूळ संकल्पना केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची असल्याचं सांगितलं जातं. या मार्गाबाबत 1995 पासून चर्चा सुरू होती. फडणवीसांच्या काळात या महामार्गाची अधिसूचना निघाली आणि आता ठाकरे सरकारच्या काळातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरत आहे.

नागार्जुन कन्स्ट्रक्शन

नागपूर-मुंबई या 710 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी या महामार्गाचं कामकाज करत आहे. मात्र मुख्य कंत्राटदार नागार्जुन कंपनीने 5 विविध कंपन्यांना कामे दिली आहेत. या कंत्राटदारांनी कामाला सुरुवात देखील केली.

हजारो एकर शेतजमिनीचं संपादन

तब्बल 710 किमी लांबीच्या या महामार्गासाठी जमीन संपादनही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची ताब्बल 9 हजार हेक्टर जमीन ही प्रत्यक्ष रस्त्यासाठी तर 11 हजार हेक्टर जमीन ही स्मार्टसिटीजसाठी ताब्यात घेतली जात आहे.

नावावरुन वादंग

 नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाच्या नावावरुन मोठा वादंग रंगला होता. अखेर  (Balasaheb Thackeray samruddhi mahamarg) शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय ठाकरे मंत्रिमंडळाने डिसेंबर 2019 मध्ये घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या राज्य  मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याची घोषणा केली होती.

देशातील पहिल्या वहिल्या मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढही बाळासाहेब ठाकरेंनी रोवली होती. त्यांच्या योगदानाचा आणि दूरदृष्टीचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली होती.

तीन वर्षांचं टार्गेट

‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी (Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg) तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 120 मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यांमधील 27 तालुक्यांच्या 392 गावांमधून जाणार आहे.

Uddhav Thackeray

1 मेपर्यंत प्रवास करणार

येत्या 1 मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज 5 डिसेंबर 2020 रोजी अमरावतीत केली. जेव्हा समृद्धी महामार्ग पूर्ण होईल, तेव्हा सर्वोत्तम महामार्ग असेल, त्याचा निश्चित महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असंसुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. या महामार्गाचं काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे, चांगल्या दर्जाचं काम होत आहे. कोरोना काळातही समृद्धी महामार्गाचं काम सुरु होतं.

येत्या 1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तर 1 मे 2022 पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरु होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

(All about to know Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg)

संबंधित बातम्या 

बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, सी लिंक, फडणवीसांच्या प्रकल्पांना ठाकरेंचा ब्रेक

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा