AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा-विदर्भ नाही, बाळासाहेबांचे नाव दिल्याने समृद्धी महामार्गाचे काम सुरु : फडणवीस

मराठवाड्याशी संबंधित दोन योजना दिल्या, पण या योजनेला ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं

ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा-विदर्भ नाही, बाळासाहेबांचे नाव दिल्याने समृद्धी महामार्गाचे काम सुरु : फडणवीस
| Updated on: Nov 23, 2020 | 11:03 AM
Share

औरंगाबाद : “ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा-विदर्भ नाहीच. नवीन सरकारने औरंगाबादच्या निधीलाही स्थगिती दिली. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव दिल्यामुळे ते काम सुरु आहे, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारला लगावला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर (Shirish Boralkar) यांच्या प्रचारासाठी फडणवीस औरंगाबादमध्ये आले होते. (Devendra Fadanvis taunts Samruddhi Mahamarg work under progress as it was named after Balasaheb Thackeray)

“मागच्या वेळी गोपीनाथ मुंडे गेल्यामुळे भाजपचा पराभव झाला, मात्र शिरीष बोराळकर यांनी चांगली मतं घेतली होती. यावेळी मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही चंग बांधला आहे. मराठवाडा आणि विदर्भाचं चित्र बदलल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही” असं फडणवीस म्हणाले.

“केंद्राच्या निधीतून आम्ही विकास केला, मराठवाड्याशी संबंधित दोन योजना दिल्या, यात मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजनाही होती. पण या योजनेला सरकारने स्थगिती दिली आहे. ते काम ठप्प आहे. समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी बकेटमध्ये आणण्यासाठी योजना केली, निधीची तरतूद केली, पण तेही काम बंद पडलेलं आहे” असं फडणवीस म्हणाले.

“मराठवाड्यातील दुष्काळामुळे शेतकरी आणि इंडस्ट्रीवर परिणाम होतो. सह्याद्रीचे पाणी आणले तर दुष्काळ संपू शकतो. औरंगाबादसाठी 1680 कोटी आम्ही पाण्यासाठी दिले. शहरातील रस्त्यांसाठी खूप निधी दिला, आता रस्ते तयार झाले. नवीन सरकारने औरंगाबादच्या निधीलाही स्थगिती दिली. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिल्यामुळे ते काम सुरु आहे” असा टोला फडणवीसांनी लगावला.

“या सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा नाहीच. मराठवाडा आणि विदर्भाला पैसे देण्याचं राज्यपालांचे बंधन या सरकारने संपवले आहे. त्यामुळे मराठवाड्यावर अन्याय होईल” अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या. “पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार पदवीधरांचे प्रश्न मांडण्याऐवजी मुंबईच्या एसआरएचे प्रश्न मांडताना दिसतात” असा घणाघातही फडणवीसांनी केला. (Devendra Fadanvis taunts Samruddhi Mahamarg work under progress as it was named after Balasaheb Thackeray)

संबंधित बातम्या :

‘महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ’, सोलापुरातल्या राड्यावरुन देवेंद्र फडणवीसांची टीका

राज्य सरकार घोषणा करतं आणि पलटतं, त्यांची भूमिका लोकविरोधी, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

(Devendra Fadanvis taunts Samruddhi Mahamarg work under progress as it was named after Balasaheb Thackeray)

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.