AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यांनी विद्यार्थ्यांना फोडाफोडीची अन् गद्दारीची…’; गुलाबराव पाटलांवर दानवेंचा हल्लाबोल

अंबदास दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी शेतकरी कर्जमाफीवर बोलताना आता थेट इशारा दिला आहे.

'त्यांनी विद्यार्थ्यांना फोडाफोडीची अन् गद्दारीची...'; गुलाबराव पाटलांवर दानवेंचा हल्लाबोल
| Updated on: Apr 13, 2025 | 5:46 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  आम्ही जसे पक्षातील कार्यकर्ते फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडा असं वक्तव्य शाळेतील पटसंख्या वाढवण्यासंदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं, पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले दानवे?

आम्ही जसे पक्षातील कार्यकर्ते फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडा असं वक्तव्य शाळेतील पटसंख्या वाढवण्यासंदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं, पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी जोरदा टोला लगावला आहे. मला वाटतं की गद्दारीची आणि फोडाफाडीची सवय त्यांनी विद्यार्थ्यांना लावू नये, असा टोला यावेळी अंबादास दानवे यांनी मंत्री पाटील यांना लगावला आहे.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीवेळी त्यांनी आपल्या फाईलींवर अर्थ खातं सह्या करत नसल्याची तक्रार अमित शाह यांच्याकडे केली. यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सगळे मिळूनच या गोष्टी करत असतात, जशा यांच्या फाईल अडवल्या जातात तशा त्यांचीही काही गोष्टी अडवल्या जातात. मला असं वाटतं हे राज्याच्या मंत्रिमंडळातील मोठे नेतेच करत असतात. ज्याच्यात दम आहे त्याच्या फाईली बरोबर मंजूर होतात, असं यावेळी दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सध्या शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांच्या कर्जमाफीसंदर्भातील वक्तव्यांमुळे कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम असल्याचं दिसून येत आहे. यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. हे सरकारने पूर्ण केलं पाहिजे.आता फक्त शेतकरी आवाज उठवत आहेत, येणाऱ्या काळात सर्व पक्ष मिळून जनआंदोलन या महाराष्ट्रात उभा करू असा इशाराही यावेळी दानवे यांनी दिला आहे.

विलीनीकरणाचा पोपट मेला? रोहित पवार सोमवारी बोलणार
विलीनीकरणाचा पोपट मेला? रोहित पवार सोमवारी बोलणार.
नरहरी झिरवाळांच्या विभागाला हादरा! एसीबीची मोठी कारवाई
नरहरी झिरवाळांच्या विभागाला हादरा! एसीबीची मोठी कारवाई.
चालकाचे लक्ष विचलित होणार नाही का? म्युझिकल रोडवर अमित ठाकरेंची टीका
चालकाचे लक्ष विचलित होणार नाही का? म्युझिकल रोडवर अमित ठाकरेंची टीका.
चंद्रपूरात शेण खाल्ले त्यांच्यावर...; संजय राऊत कडाडले
चंद्रपूरात शेण खाल्ले त्यांच्यावर...; संजय राऊत कडाडले.
शिवसेनेला दोष देऊ नका! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
शिवसेनेला दोष देऊ नका! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.