AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यांनी विद्यार्थ्यांना फोडाफोडीची अन् गद्दारीची…’; गुलाबराव पाटलांवर दानवेंचा हल्लाबोल

अंबदास दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी शेतकरी कर्जमाफीवर बोलताना आता थेट इशारा दिला आहे.

'त्यांनी विद्यार्थ्यांना फोडाफोडीची अन् गद्दारीची...'; गुलाबराव पाटलांवर दानवेंचा हल्लाबोल
| Updated on: Apr 13, 2025 | 5:46 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  आम्ही जसे पक्षातील कार्यकर्ते फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडा असं वक्तव्य शाळेतील पटसंख्या वाढवण्यासंदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं, पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले दानवे?

आम्ही जसे पक्षातील कार्यकर्ते फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडा असं वक्तव्य शाळेतील पटसंख्या वाढवण्यासंदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं, पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी जोरदा टोला लगावला आहे. मला वाटतं की गद्दारीची आणि फोडाफाडीची सवय त्यांनी विद्यार्थ्यांना लावू नये, असा टोला यावेळी अंबादास दानवे यांनी मंत्री पाटील यांना लगावला आहे.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीवेळी त्यांनी आपल्या फाईलींवर अर्थ खातं सह्या करत नसल्याची तक्रार अमित शाह यांच्याकडे केली. यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सगळे मिळूनच या गोष्टी करत असतात, जशा यांच्या फाईल अडवल्या जातात तशा त्यांचीही काही गोष्टी अडवल्या जातात. मला असं वाटतं हे राज्याच्या मंत्रिमंडळातील मोठे नेतेच करत असतात. ज्याच्यात दम आहे त्याच्या फाईली बरोबर मंजूर होतात, असं यावेळी दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सध्या शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांच्या कर्जमाफीसंदर्भातील वक्तव्यांमुळे कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम असल्याचं दिसून येत आहे. यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. हे सरकारने पूर्ण केलं पाहिजे.आता फक्त शेतकरी आवाज उठवत आहेत, येणाऱ्या काळात सर्व पक्ष मिळून जनआंदोलन या महाराष्ट्रात उभा करू असा इशाराही यावेळी दानवे यांनी दिला आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.