AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबेडकरांनी एक धोका सांगितला होता, इतिहासाचा दाखला देत काय म्हणाले राज ठाकरे ?

राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे धडाकेबाज भाषण केले.त्यांनी एकाच उद्योगपतीला सर्व अधिकार दिल्याने उद्या वीजेचे दर उद्योगपती ठरवतील अशी भीतीही व्यक्त केली. यावेळी त्यांना भाषावार रचने संदर्भातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणाचा एक दाखला दिला.

आंबेडकरांनी एक धोका सांगितला होता, इतिहासाचा दाखला देत काय म्हणाले राज ठाकरे ?
raj thackeray
| Updated on: Jan 11, 2026 | 9:23 PM
Share

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज शिवतीर्थावर तुफान फटकेबाजी झाली. राज ठाकरे यांनी मुंबईतील जागा कशा विकल्या जात आहेत. या संदर्भात व्हिडीओ सादरीकरण करुन दाखवले. यावेळी राज ठाकरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक धोका सांगितला होता असा उल्लेख करत माहिती दिली. राज ठाकरे यावेळी म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी मांडलं होतं. आज तुम्हाला कळेल पुढे काय वाढून ठेवले आहे असे म्हणत राज ठाकरे यांनी डॉ. आंबेडकर यांनी व्यक्त केलेली भीती बोलून दाखवली.

राज ठाकरे यावळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब यांनी लिहिले होते की उत्तर प्रदेश, बिहार यांची सारखी राज्य निर्माण करून तसेच राज्य पुनर्रचना निर्माण करून विषमता निर्माण करीत आहे. माझ्याकडे घटना समितीचे काम होते. तेव्हाचं गुपित आहे. काँग्रेसच्या बैठकीतील हे गुपित आहे. हिंदी भाषेवरून त्यांच्यात गरमागरम चर्चा झाली. मतास हा मुद्दा टाकल्यावर ७८ विरुद्ध ७८ मतदान झालं. काय आश्चर्य आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार भविष्यात प्रबळ ठरेल. ही भीती तामिळनाडूसह इतरांनाही आहे. ही भीती राष्ट्रीय ऐक्यास घातक ठरल्याशिवाय राहणार नाही असे बाबासाहेब आंबडेकर यांनी त्यावेळी म्हटल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

 हिंदी ही यूपी आणि बिहारची भाषा नाही

मला सांगायचं आहे. हिंदी ही यूपी आणि बिहारची भाषा नाही. मैथिली आणि अवधी तुमची भाषा आहे. आमच्यावर भाषा लादत असाल तर लाथ मारू. बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय हे किती घातक आहे. ही काय चाल चालू आहे. देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र, सर्व बाजूने संपन्न महाराष्ट्र हे सर्व बाजूने येत आहेत. हे फक्त तुमचे चावे घेत आहेत. तुम्हाला उद्ध्वस्त करायचे आहे अशी भीती राज ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली.

जमिनीलाच रिअर इस्टेट म्हटले जाते…

राज यांनी यावेळी म्हणाले  हिरे असतात, मोती, चांदी असते. अजून मौल्यवान गोष्टी असतात. फक्त जमिनीलीच ‘रिअल इस्टेट’ का म्हणतात..? खरी संपत्ती म्हणतात.  इतर कोणत्याच गोष्टीला रिअल इस्टेट म्हणत नाही. जमीन पायाखालची गेली तर सर्व संपलं. जगातील अनेक देश जमीन गेल्याने संपले. संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणारे धनिक होते. गुजराती होते, पण धनिक होते. आज हे संकट तुमच्या उंबरठ्यावर आलं आहे. कधी तुमच्या दरवाज्यावर टकटक होईल तुम्हाला कळणार नाही अशीही भीती राज ठाकरे यांनी बोलून दाखवली.

कोकणपट्टी रिकामी केली जात आहे. जमिनीच्या जमिनी विकत घेत आहे. त्यावेळी बुलेट ट्रेनला मी विरोध केला. आताही मी विरोध केला आहे. अहमदाबादमध्ये ढोलेना नवीन शहर बसवलं जातं. मुंबईपेक्षा दीडपट मोठं आहे. तिथे वेदांत आणि फॉक्सकॉनचे सेमी रुल्स येत आहेत. वसई विरारपासून कसे भरत येत आहेत असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत