AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबेडकरांनी एक धोका सांगितला होता, इतिहासाचा दाखला देत काय म्हणाले राज ठाकरे ?

राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे धडाकेबाज भाषण केले.त्यांनी एकाच उद्योगपतीला सर्व अधिकार दिल्याने उद्या वीजेचे दर उद्योगपती ठरवतील अशी भीतीही व्यक्त केली. यावेळी त्यांना भाषावार रचने संदर्भातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणाचा एक दाखला दिला.

आंबेडकरांनी एक धोका सांगितला होता, इतिहासाचा दाखला देत काय म्हणाले राज ठाकरे ?
raj thackeray
| Updated on: Jan 11, 2026 | 9:23 PM
Share

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज शिवतीर्थावर तुफान फटकेबाजी झाली. राज ठाकरे यांनी मुंबईतील जागा कशा विकल्या जात आहेत. या संदर्भात व्हिडीओ सादरीकरण करुन दाखवले. यावेळी राज ठाकरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक धोका सांगितला होता असा उल्लेख करत माहिती दिली. राज ठाकरे यावेळी म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी मांडलं होतं. आज तुम्हाला कळेल पुढे काय वाढून ठेवले आहे असे म्हणत राज ठाकरे यांनी डॉ. आंबेडकर यांनी व्यक्त केलेली भीती बोलून दाखवली.

राज ठाकरे यावळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब यांनी लिहिले होते की उत्तर प्रदेश, बिहार यांची सारखी राज्य निर्माण करून तसेच राज्य पुनर्रचना निर्माण करून विषमता निर्माण करीत आहे. माझ्याकडे घटना समितीचे काम होते. तेव्हाचं गुपित आहे. काँग्रेसच्या बैठकीतील हे गुपित आहे. हिंदी भाषेवरून त्यांच्यात गरमागरम चर्चा झाली. मतास हा मुद्दा टाकल्यावर ७८ विरुद्ध ७८ मतदान झालं. काय आश्चर्य आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार भविष्यात प्रबळ ठरेल. ही भीती तामिळनाडूसह इतरांनाही आहे. ही भीती राष्ट्रीय ऐक्यास घातक ठरल्याशिवाय राहणार नाही असे बाबासाहेब आंबडेकर यांनी त्यावेळी म्हटल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

 हिंदी ही यूपी आणि बिहारची भाषा नाही

मला सांगायचं आहे. हिंदी ही यूपी आणि बिहारची भाषा नाही. मैथिली आणि अवधी तुमची भाषा आहे. आमच्यावर भाषा लादत असाल तर लाथ मारू. बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय हे किती घातक आहे. ही काय चाल चालू आहे. देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र, सर्व बाजूने संपन्न महाराष्ट्र हे सर्व बाजूने येत आहेत. हे फक्त तुमचे चावे घेत आहेत. तुम्हाला उद्ध्वस्त करायचे आहे अशी भीती राज ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली.

जमिनीलाच रिअर इस्टेट म्हटले जाते…

राज यांनी यावेळी म्हणाले  हिरे असतात, मोती, चांदी असते. अजून मौल्यवान गोष्टी असतात. फक्त जमिनीलीच ‘रिअल इस्टेट’ का म्हणतात..? खरी संपत्ती म्हणतात.  इतर कोणत्याच गोष्टीला रिअल इस्टेट म्हणत नाही. जमीन पायाखालची गेली तर सर्व संपलं. जगातील अनेक देश जमीन गेल्याने संपले. संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणारे धनिक होते. गुजराती होते, पण धनिक होते. आज हे संकट तुमच्या उंबरठ्यावर आलं आहे. कधी तुमच्या दरवाज्यावर टकटक होईल तुम्हाला कळणार नाही अशीही भीती राज ठाकरे यांनी बोलून दाखवली.

कोकणपट्टी रिकामी केली जात आहे. जमिनीच्या जमिनी विकत घेत आहे. त्यावेळी बुलेट ट्रेनला मी विरोध केला. आताही मी विरोध केला आहे. अहमदाबादमध्ये ढोलेना नवीन शहर बसवलं जातं. मुंबईपेक्षा दीडपट मोठं आहे. तिथे वेदांत आणि फॉक्सकॉनचे सेमी रुल्स येत आहेत. वसई विरारपासून कसे भरत येत आहेत असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी