AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावतीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 वर, पहिल्या मृत व्यक्तीच्या संपर्कातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही चारवर पोहोचली आहे. यामुळे अमरावतीतील जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले (Amravati Corona Positive) आहे.

अमरावतीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 वर, पहिल्या मृत व्यक्तीच्या संपर्कातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
| Updated on: Apr 08, 2020 | 9:22 AM
Share

अमरावती : अमरावतीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या तिघांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह (Amravati Corona Positive) आला आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही चारवर पोहोचली आहे. यामुळे अमरावतीतील जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या आठवडाभरात राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत (Amravati Corona Positive) आहे. अमरावतीत 2 एप्रिलला एका कोरोनाबाधित व्यक्तीचे निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 24 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील तिघांचे कोरोना रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट आकडा चारवर गेला आहे. या सर्वांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

अमरावीतील एका खासगी रुग्णालयात 2 एप्रिलला एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्याला न्युमोनिया झाल्याचे खासगी डॉक्टरांना सांगितले होते. मात्र रुग्णाला श्वसनक्रियेत अडथळे येत होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

यानंतर अमरावती शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी दक्षतेचे पालन करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. घाबरून न जाता दक्ष राहावे. आपल्यासह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी, न्युमोनियाचे निदान झालेल्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

दरम्यान मुंबईसह महाराष्ट्रातही कोरोनाचा फैलाव वाढला आहे. मुंबईत आतापर्यंत 642 जणांना कोरोनाची लागण लागण झाली आहे. तर राज्यात 1 हजार 018 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यत मुंबईत 40 आणि राज्यात 64 जणांचा मृत्यू झाला (Amravati Corona Positive) आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.