AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात उन्हाचा कहर, 24 तासांत 13 जणांचा गूढ मृत्यू, नेमकं काय घडलं?

अमरावती आणि जळगाव जिल्ह्यात उन्हाचा हाहाकार पाहायला मिळत असून गेल्या २४ तासांत अमरावतीत ७ तर जळगावात ४ जणांचा उष्माघाताने आणि तीव्र उष्णतेमुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात उन्हाचा कहर, 24 तासांत 13 जणांचा गूढ मृत्यू, नेमकं काय घडलं?
Heatwave
| Updated on: May 26, 2026 | 10:20 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच विदर्भासह खान्देशात सध्या उन्हाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. यामुळे अमरावती आणि जळगाव जिल्ह्यात परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. अमरावतीत गेल्या २४ तासांत शहराच्या वेगवेगळ्या भागात तब्बल ७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातही एका सेंट्रिंग कामगारासह एकूण ४ जणांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला आहे.

अमरावतीत बेघर आणि बेवारस व्यक्तींना उन्हाचा मोठा फटका

अमरावतीत गेल्या २४ तासात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील २ जणांचा मृत्यू अधिकृतरीत्या उष्माघाताने (Heatstroke) झाल्याची नोंद आहे. तर उर्वरित ५ जणांचा मृत्यू तीव्र उष्णतेचा फटका बसल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या वाढत्या उन्हाचे बळी प्रामुख्याने रस्त्यावर राहणारे बेघर आणि बेवारस व्यक्ती ठरत असल्याचे समोर येत आहे.

मे महिन्याच्या उत्तरार्धात अमरावतीचा पारा सातत्याने ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवला जात आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अमरावती आणि अकोला परिसराला रेड अलर्ट जारी केला आहे. अमरावती शहरातील ओल्ड कॉटन मार्केट परिसर व इतर भागात अनेक बेवारस आणि वृद्ध व्यक्तींचे मृतदेह आढळून आले आहेत. तीव्र उन्हात सावली न मिळणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण अचानक कमी झाल्यामुळे हे मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन रुग्णालय) येथे पाठवण्यात आले आहेत.

जळगावात कामगारासह ४ जणांचा मृत्यू

तर जळगाव जिल्ह्यातही गेल्या महिन्याभरापासून तापमानाचा पारा चाळीशी पार असून वातावरणातील तीव्र उष्णतेचा मोठा परिणाम नागरिकांवर होत आहे. या जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगावातील चिंचोली येथील ५७ वर्षीय सेंट्रिंग कामगार केशरलाल दौलत पाटील उन्हात काम करत असताना अचानक चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्या उष्माघाताने मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतर घटनांमध्ये ३५ वर्षीय प्रवीण दत्तु मिस्तरी, ३६ वर्षीय श्रीकांत रमेश कोळी व ४० वर्षीय नंदू किशोर पाटील या तीन तरुणांचा उलटी, चक्कर यांसह इतर उष्माघात सदृश्य लक्षणांनी मृत्यू झाला आहे.

चंद्रपुरात दोघांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या उन्हाचा तीव्र तडाखा पाहायला मिळत असून भद्रावती तालुक्यात उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भद्रावतीमधील मुरसा येथे एका अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला, तर भद्रावती शहरातील आंबेडकर चौकातील एका पडक्या घरात राहणाऱ्या ६० वर्षीय निराधार महिला पौर्णिमा विक्रम पेटकर यांचाही मृत्यू झाला. प्रचंड उष्णतेमुळे उष्माघात होऊनच या दोन्ही व्यक्तींचा जीव गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तापमान सतत ४७ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात असल्याने नागरिक हैराण झाले असून, या वाढत्या उन्हाने प्रशासनाची चिंताही वाढवली आहे.

प्रशासनाचे आवाहन आणि उपाययोजना

या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयांसह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष (Heatstroke Wards) सज्ज करण्यात आले आहेत.

दुपारच्या वेळी (विशेषतः दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान) नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

रस्त्यावरील बेघरांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची सोय करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा