AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक, भाजपाचे उमेदवार रणजित पाटील; बच्चू कडू काय भूमिका घेणार?

प्रहार पक्षाकडून राज्यात पाच ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. आमच्या प्रस्तावाची फडणवीस - शिंदे यांनी दखल घेतली नाही. असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक, भाजपाचे उमेदवार रणजित पाटील; बच्चू कडू काय भूमिका घेणार?
रणजित पाटील
| Edited By: | Updated on: Jan 07, 2023 | 7:53 PM
Share

अमरावती : अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार माजीमंत्री डॉ. रणजित पाटील हे आपला उमेदवारी अर्ज अकरा तारखेला भरणार आहेत. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार आहे. 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अमरावती येथील पी आर पोटे महाविद्यालय संकुलातील सभागृहात अमरावती विभागातील पदवीधरांचा मेळावा आयोजिण्यात आला आहे.

बच्चू कडू हे भाजप -शिंदे युतीमध्ये आहेत. प्रहार पक्षाकडून राज्यात पाच ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. आमच्या प्रस्तावाची फडणवीस – शिंदे यांनी दखल घेतली नाही. असा आरोप बच्चू कडू यांनी केला. त्यानंतर रणजित पाटील म्हणाले, प्रहार त्यांचा पक्ष आहे. तो निर्णय ते घेतील. पण मित्र पक्ष म्हणून आम्ही सुद्धा त्यांना विनंती करू.

रणजित पाटील म्हणाले, प्रत्येक निवडणुकीला नव्यानं नोंदणी करावी लागते. सहा महिने द्यावं लागतात. नोंदणी लोकांमध्ये जाऊन केली आहे. मंत्री आणि आमदार असताना केलेलं काम आणि पक्षानं केलेलं काम या सगळ्या कामाचा लेखा घेऊन मतदारांकडं पोहचणार आहोत. बूथ लावल्यावर लोकं स्वतःहून कागदपत्र आणून देतात.

प्रत्येक पक्षाचा उमेदवार आमच्या विरोधात उभा राहील. हे लक्षात घेऊनचं आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय. माझ्या दोन्ही निवडणुकीमध्ये सगळ्या राष्ट्रीय पक्षांनी उमेदवार दिला होता.

२० ते २५ उमेदवार निवडणुकीला उभे राहतात. प्रत्येक निवडणुकीला आपआपला स्वभाव असतो. निवडणुकीवर प्रभाव असतो. संबंधित नेतृत्व काम करत असते. त्यांच्याकडं बघून लोकं मतदान करत असतात, असंही रणजित पाटील यांनी सांगितलं.

'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.