AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक, भाजपाचे उमेदवार रणजित पाटील; बच्चू कडू काय भूमिका घेणार?

प्रहार पक्षाकडून राज्यात पाच ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. आमच्या प्रस्तावाची फडणवीस - शिंदे यांनी दखल घेतली नाही. असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक, भाजपाचे उमेदवार रणजित पाटील; बच्चू कडू काय भूमिका घेणार?
रणजित पाटील
| Edited By: | Updated on: Jan 07, 2023 | 7:53 PM
Share

अमरावती : अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार माजीमंत्री डॉ. रणजित पाटील हे आपला उमेदवारी अर्ज अकरा तारखेला भरणार आहेत. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार आहे. 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अमरावती येथील पी आर पोटे महाविद्यालय संकुलातील सभागृहात अमरावती विभागातील पदवीधरांचा मेळावा आयोजिण्यात आला आहे.

बच्चू कडू हे भाजप -शिंदे युतीमध्ये आहेत. प्रहार पक्षाकडून राज्यात पाच ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. आमच्या प्रस्तावाची फडणवीस – शिंदे यांनी दखल घेतली नाही. असा आरोप बच्चू कडू यांनी केला. त्यानंतर रणजित पाटील म्हणाले, प्रहार त्यांचा पक्ष आहे. तो निर्णय ते घेतील. पण मित्र पक्ष म्हणून आम्ही सुद्धा त्यांना विनंती करू.

रणजित पाटील म्हणाले, प्रत्येक निवडणुकीला नव्यानं नोंदणी करावी लागते. सहा महिने द्यावं लागतात. नोंदणी लोकांमध्ये जाऊन केली आहे. मंत्री आणि आमदार असताना केलेलं काम आणि पक्षानं केलेलं काम या सगळ्या कामाचा लेखा घेऊन मतदारांकडं पोहचणार आहोत. बूथ लावल्यावर लोकं स्वतःहून कागदपत्र आणून देतात.

प्रत्येक पक्षाचा उमेदवार आमच्या विरोधात उभा राहील. हे लक्षात घेऊनचं आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय. माझ्या दोन्ही निवडणुकीमध्ये सगळ्या राष्ट्रीय पक्षांनी उमेदवार दिला होता.

२० ते २५ उमेदवार निवडणुकीला उभे राहतात. प्रत्येक निवडणुकीला आपआपला स्वभाव असतो. निवडणुकीवर प्रभाव असतो. संबंधित नेतृत्व काम करत असते. त्यांच्याकडं बघून लोकं मतदान करत असतात, असंही रणजित पाटील यांनी सांगितलं.

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.