AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati | गुरुकुंज मोझरीतील भोंग्यावर ध्यानाची 80 वर्षांची परंपरा खंडित; गुरुदेव भक्तांची नाराजी

अखिल विश्वाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीमधील आश्रम 80 वर्षापासून भोंग्यावर ध्यान म्हणण्याची परंपरा आहे.

Amravati | गुरुकुंज मोझरीतील भोंग्यावर ध्यानाची 80 वर्षांची परंपरा खंडित; गुरुदेव भक्तांची नाराजी
गुरुकुंज मोझरीत भोंग्याविना पार पडली सामुदायिक प्रार्थना Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 06, 2022 | 11:48 AM
Share

अमरावती : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधी मशीद आणि नंतर मांदिरावरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. न्यायालयाने आदेश दिल्याने राज्यातील अनेक महत्वाच्या मंदिरातील आरत्या या भोंग्याविना पार पडत आहेत. अशातच सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रममधील ( Gurukunj Ashram) महाद्वारावर असलेल्या भोंग्याची परंपरा इतिहासात पहिल्यांदा खंडित झाली आहे. पहाटे प्रार्थना मंदिरात होणारे सामुदायिक ध्यान आज भोंग्याविना पार पडले. स्थानिक गुरुदेव भक्तांनी (Gurudev devotees) नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू असे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे. गेल्या 80 वर्षांची ध्यानाची परंपरा (tradition of meditation) आहे. या निर्णयाने ही परंपरा आज खंडित झाली.

गुरुकुंज मोझरीत सकाळी सामुदायिक ध्यान

अखिल विश्वाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीमधील आश्रम 80 वर्षापासून भोंग्यावर ध्यान म्हणण्याची परंपरा आहे. सकाळी सामुदायिक ध्यानाअगोदर तुकडोजी महाराजांच्या आवाजातील भजने व अभंगाच्या माध्यमातून परिसरात प्रसन्नता निर्माण केली जाते. त्यामुळे पंचक्रोशीमधील अनेक लोकांची पहाट सामुदायिक ध्यानाने होते.

आश्रमातील भोंगे चालू करावे

परंतु, राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर न्यायालयाने भोंग्यांवर काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे तुकडोजी महाराजांच्या आश्रमातील भोंगादेखील आता बंद झाला आहे. आज सकाळचे सामुदायिक ध्यान भोंग्याविना पार पडले आहे. त्यामुळे परिसरामध्ये सकाळी शांतता झाली होती. दिवसाची सुरुवात आम्ही महाराजांच्या आश्रमातील सामुदायिक ध्यानाने करतो, अशी प्रतिक्रिया अनेक गुरुदेव भक्तांनी दिली. त्यामुळे कुठलीही अट न ठेवता तुकडोजी महाराजांच्या आश्रमातील भोंगे चालू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.