AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Bonde | मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे मोठ्या घरचा पोकळ वासा, हवा गेली भसाभसा; अमरावतीत अनिल बोंडेंनी उडवली खिल्ली

बोंडे म्हणाले, राज्यात बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. हे सर्व विषय मुख्यमंत्र्यांनी हाताळले नाहीत. औरंगाबादच्या नामांतरणाविषयी अवाक्षरही बोलले नाहीत. संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. शिवसेनेच्या अजेंड्यात औरंगाबादचे संभाजीनगर करणार, असे घोषणापत्रात लिहिले होते. यावर मुख्यमंत्री काहीच का बोलले नाही.

Anil Bonde | मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे मोठ्या घरचा पोकळ वासा, हवा गेली भसाभसा; अमरावतीत अनिल बोंडेंनी उडवली खिल्ली
| Edited By: | Updated on: May 15, 2022 | 2:14 PM
Share

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी काल मुंबईत सभा घेतली. मुख्यमंत्र्यांची कालची सभा म्हणजे मोठया घरचा पोकळ बासा आणि हवा गेली भसा भसा, अशी टीका भाजपच्या अनिल बोंडे (BJP’s Anil Bonde) यांनी केली. भोंडे म्हणाले, मुख्यमंत्री मुंबई म्हणजेच महाराष्ट्र आहे असे समजायला लागलेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नवर तरुणांच्या प्रश्नावर ते काहीच बोलले नाही. काकांच्या (शरद पवारांच्या) डोक्यात सगळी किळमट आहे. अजित पवारांना (Ajit Pawar) आजही वाटते यांच्यापेक्षा भाजप बरी आहे. संभाजी नगर तोंडाने म्हणून जमत नाही; सरकार दरबारी नोंद असली पाहिजे, असा टोलाही बोंडे यांनी लगावला.

औरंगाबादच्या नामांतरणाविषयी का बोलले नाही

बोंडे म्हणाले, राज्यात बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. हे सर्व विषय मुख्यमंत्र्यांनी हाताळले नाहीत. औरंगाबादच्या नामांतरणाविषयी अवाक्षरही बोलले नाहीत. संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. शिवसेनेच्या अजेंड्यात औरंगाबादचे संभाजीनगर करणार, असे घोषणापत्रात लिहिले होते. यावर मुख्यमंत्री काहीच का बोलले नाही, असंही ते म्हणाले.

केतकीसोबतच शरद पवारांवरही टीका

अनिल बोंडे यांनी केतकीसोबत शरद पवार यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, निश्चितच केतकी चितळे ही चुकली आहे. वयोवृद्ध माणसाला असं बोलू नये. पण शरद पवारही तर चुकले. केतकी चितळेला शरद पवारांच राजकारण कळत नाही. शरद पवारांना हिंदू धर्मात उभी फूट पाडायची आहे. देवेंद्र फडणवीस हे ब्राम्हण असल्यामुळं त्यांच्या विरुद्ध सर्व समाजाला पेटवायचं. कुटिल कारस्थान शरद पवार करतात, असंही अनिल बोंडे म्हणालेत.

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.