AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati News : ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाईचा झळा, वातावरणाचा बदलाचा फटका शेतकऱ्यांनाही

मागील दोन महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी नागरिकांना स्वेटर मफलर कान टोप्या वापरावे लागतात.

Amravati News : ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाईचा झळा, वातावरणाचा बदलाचा फटका शेतकऱ्यांनाही
अमरावतीImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 07, 2023 | 11:20 AM
Share

सुरेंद्रकुमार आकोडे, अमरावती : राज्यात (Amravati News) काही जिल्ह्यात वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संभ्रमात सापडले आहेत. दिवसभर उन्हाचे चटके, रात्री थंडीची हुडहुडी यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात आजारी पडले आहेत. त्याचबरोबर या वातावरणाचा फटका सुध्दा शेतकऱ्यांना (Farmer) बसत आहे. विविध पीक काढणीला आली आहेत. त्यावर या वातावरणाचा परिणाम होत आहे. बदलत्या वातावरणामुळे (Due to the changing environment) सद्या सर्दी, खोकला आणि ताप अशा आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

अमरावतीत दिवसा उन्हाची तीव्रता आणि रात्री तसेच पहाटेच्या वेळी थंडी अशा वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. वातावरणातील उकाडा वाढत असल्याने आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कधी थंडी तर कधी काही तासातच उकडा असा वातावरणाचा अनुभव असतानाच हा हिवाळा की उन्हाळा असा प्रश्न नागरिकांना पडतं आहे. वातावरणातील बदलाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. सद्या सर्दी, खोकला आणि ताप अशा आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मागील दोन महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी नागरिकांना स्वेटर मफलर कान टोप्या वापरावे लागतात. सकाळी शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना सुद्धा स्वेटरचा वापर करावा लागतोय. सकाळी दहा नंतर कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ग्रामीण भागात तर आतापासूनच पाणीटंचाईचा झळा लागण्यास सुरुवात झाली आहे.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.