AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati News : ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाईचा झळा, वातावरणाचा बदलाचा फटका शेतकऱ्यांनाही

मागील दोन महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी नागरिकांना स्वेटर मफलर कान टोप्या वापरावे लागतात.

Amravati News : ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाईचा झळा, वातावरणाचा बदलाचा फटका शेतकऱ्यांनाही
अमरावतीImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 07, 2023 | 11:20 AM
Share

सुरेंद्रकुमार आकोडे, अमरावती : राज्यात (Amravati News) काही जिल्ह्यात वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संभ्रमात सापडले आहेत. दिवसभर उन्हाचे चटके, रात्री थंडीची हुडहुडी यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात आजारी पडले आहेत. त्याचबरोबर या वातावरणाचा फटका सुध्दा शेतकऱ्यांना (Farmer) बसत आहे. विविध पीक काढणीला आली आहेत. त्यावर या वातावरणाचा परिणाम होत आहे. बदलत्या वातावरणामुळे (Due to the changing environment) सद्या सर्दी, खोकला आणि ताप अशा आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

अमरावतीत दिवसा उन्हाची तीव्रता आणि रात्री तसेच पहाटेच्या वेळी थंडी अशा वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. वातावरणातील उकाडा वाढत असल्याने आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कधी थंडी तर कधी काही तासातच उकडा असा वातावरणाचा अनुभव असतानाच हा हिवाळा की उन्हाळा असा प्रश्न नागरिकांना पडतं आहे. वातावरणातील बदलाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. सद्या सर्दी, खोकला आणि ताप अशा आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मागील दोन महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी नागरिकांना स्वेटर मफलर कान टोप्या वापरावे लागतात. सकाळी शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना सुद्धा स्वेटरचा वापर करावा लागतोय. सकाळी दहा नंतर कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ग्रामीण भागात तर आतापासूनच पाणीटंचाईचा झळा लागण्यास सुरुवात झाली आहे.

Follow Us
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...