AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय स्पर्धा सुरु आहे का? कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन अंजली दमानिया संतापल्या

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानांना आणि विधानसभेत पत्ते खेळल्याच्या प्रकरणाला कारणीभूत ठरत, दमानिया यांनी त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. अजित पवार यांच्या प्रतिक्रियेवरही त्यांनी टीका केली आहे. दमानिया यांच्या मागणीमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

काय स्पर्धा सुरु आहे का? कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन अंजली दमानिया संतापल्या
anjali damania ajit pawar
| Updated on: Jul 30, 2025 | 1:36 PM
Share

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या घटनांवर भाष्य केले. यावेळी अंजली दमानिया यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांनंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावर अंजली दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच माणिकराव कोकाटे हे अधिवेशनात पत्ते खेळताना दिसल्याने त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.

अंजली दमानिया यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी अंजली दमानिया यांनी अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्या भेटीबद्दलही भाष्य केले. अजित पवारांनी सुरुवातीला असे म्हटले होते की जर शिंदेंच्या मंत्र्यांवर कारवाई झाली तरच आम्ही आमच्या मंत्र्यांवर कारवाई करणार, याला स्पर्धा म्हणावी लागेल. ही धक्कादायक बाब आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

कारवाई झाली नाही तर दुर्दैवी

त्यांनी पुढे नमूद केले की, अजित पवारांनी कोकाटेंना किती वेळा माफ करणार? असे म्हटल्याचे ऐकलं आहे. माणिकराव कोकाटेंनी यापूर्वीही अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. प्रत्येक वेळी त्यांनी माफी मागितली आहे, असे दमानिया यांनी निदर्शनास आणले. यात आपल्याला थेट कारवाई कुठेही झालेली दिसत नाही. एकदा ओसाड गावची पाटील की म्हणजे कृषिमंत्री पद हे म्हणणं तिथेच खरं तर ऑब्जेक्शन घेणं गरजेचं होतं. पण एकदा नाही अनेक वेळा विमा वर्ण म्हणा, शेतकऱ्यांना मारलेले टोले म्हणा किंवा ओसाड गावची पाटील की म्हणा इतकी विधान करून सुद्धा कारवाई झाली नाही. आता तर थेट पत्ते खेळताना जेव्हा दिसतात, तरी जर कारवाई झाली नाही तर दुर्दैवी आहे. खरं अजित पवारांनी हे करणं अपेक्षित होतं, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.

ताबडतोब राजीनामा झाला पाहिजे

यानंतर अंजली दमानिया यांनी रोहित पवारांच्या ट्वीटबद्दलही भाष्य केले. “अधिवेशनात काय करत होते, कोणी आरोप काय केले? मला त्याच्यात नाही पडायचे. आपल्याला दिसतंय की त्या अधिवेशनात पत्ते खेळत होते. एका मंत्र्याकडूनही अपेक्षा नक्कीच नसते. लोकांचे प्रश्न मांडायला तुम्ही तिथे अधिवेशनात जातात. हे जर तुम्ही कृत्य केलं, तर ताबडतोब राजीनामा झाला पाहिजे,” असे दमानिया यांनी ठामपणे सांगितले. अंजली दमानिया यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा मुद्द्यांवर चर्चा पाहायला मिळत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.