AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनकडून पाकिस्तासोबत दोस्तीत कुस्ती, काबुलमध्ये बोलावून केला मोठा गेम, पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांना वेड्यात काढलं

काबुलमध्ये बुधवारी वीस ऑगस्ट रोजी 90 दिवसांनंतर अफगाणिस्तान, चीन आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये चीनकडून पाकिस्तानला मोठा धक्का देण्यात आला आहे.

चीनकडून पाकिस्तासोबत दोस्तीत कुस्ती, काबुलमध्ये बोलावून केला मोठा गेम, पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांना वेड्यात काढलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 21, 2025 | 4:33 PM
Share

काबुलमध्ये बुधवारी वीस ऑगस्ट रोजी 90 दिवसांनंतर अफगाणिस्तान, चीन आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक बैठक पार पडली. तीनही देशांच्या हिताचे निर्णय घेणं हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता. मात्र पाकिस्तानला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. बैठकीत अफगाणिस्तान आणि चीनच्या हिताचे निर्णय तर झाले आणि पाकिस्तानवर हात चोळण्याची वेळ आली. पाकिस्तान या बैठकीमध्ये एकटा पडल्याचं पाहायला मिळालं.

काबुलमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानमधील दहशतवाद नियंत्रणावर कोणताही निर्णय घेतला नाही, किंवा पाकिस्तानला तसं कोणतंही आश्वासन अफागाणिस्तानकडून देण्यात आलेलं नाही. पाकिस्तानच्या वतीनं या बैठकीमध्ये परराष्ट्र मंत्री तसेच उप पंतप्रधान इशाक डार हे सहभागी झाले हेते. अफगाणिस्तान दहशतवादाविरोधात खूपच धिम्य गतीनं कारवाई करत आहे, असं म्हणण्याची वेळ या बैठकीच्या शेवटी डार यांच्यावर आली.

या त्री सदस्यीय बैठकीमध्ये दहशतवाद, सुरक्षा आणि व्यापार अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार होती. मात्र बैठकीत फक्त सुरक्षा आणि व्यापार या दोनच गोष्टींवर चर्चा झाली, दहशतवादावर कोणतीही चर्चा झाली नाही, सध्या टीटीपी हा पाकिस्तानसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. अफगाणिस्तानकडून चीनला आश्वासन देण्यात आलं, सुरक्षेची गॅरंटी देण्यात आली की, आमच्या देशातून तुमच्याविरोधात कुठलीही कारवाई होणार नाही, परंतु अफगाणिस्तानकडून पाकिस्तानला अशी कोणतीच गॅरंटी देण्यात आली नाही, चीनने देखील यावर मौन राहाणंच योग्य समजलं.

दुसरीकडे या तीन्ही देशांमध्ये व्यापारावर देखील चर्चा झाली, त्यामध्ये काबुलपासून चीनपर्यंत सीपीईसीच्या निर्मानाला मंजुरी मिळाली आहे, मात्र यामध्ये अशी एकही गोष्ट घडली नाही, ज्यामुळे पाकिस्तानचा फायदा होईल, व्यापारात देखील पाकिस्तानच्या फार काही हाती लागलं नाही, उलट 2025 मध्ये पाकिस्तानचा अफगानिस्तानसोबत सुरू असलेल्या व्यापारामध्ये 12 टक्क्यांची घट झाली आहे.  एकीकडे अफगाणिस्तानकडून चीनला आमच्याकडून तुमच्या विरोधात कोणतीही कारवाई होणार नसल्याचं अश्वासन देण्यात आलं आहे, तसेच सीपीईसीला देखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे या बैठकीतून पाकिस्ताच्या हाती काहीच लागलेलं नाही.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?