Ashok Kharat : अशोक खरातचा थेट एन्काऊंटर? एका दाव्याने महाराष्ट्रात खळबळ; ठीक 24 तारखेला…
भोंदुबाबा अशोक खरात याला लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तो 24 मार्चपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहे. असे असतानाच त्यांच्या एन्काऊंटरबाबात मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat : भोंदू बाबा अशोक खरातने भोंदुगिरीच्या मदतीनेत अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. एका महिलेने समोर येत बलात्कार केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर अशोक खरातचे हे बिंग फुटले आहे. त्याने वेगवेगळ्या महिलांवर अत्याचार केलेले जवळपास 100 व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर अशोक खरात पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नीरज जाधवलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आता अशोक खरातला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता त्याचे एन्काऊंटर होणार असल्याचा दावा समोर आला आहे. या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
अशोक खरात प्रकरणात तीनच दिवसांत…
भूमता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी अशोक खरात याचा एन्काऊंटर होऊ शकतो, अशी शंका व्यक्त केली आहे. “अशोक खरात प्रकरणात तीनच दिवसांत रुपली चाकणकर यांचे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गेले. माझी सुनेत्रा पवार यांनी रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.
न्यायालयापुढे हजर करताना त्याचे एन्काऊंटर…
अशोक खरात याचे संबंध अनेक मंत्री, राजकारण्यांशी आहेत. त्यामुळे अनेकांचे पितळ उघडे पडू शकते. त्याचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध आहेत. हे संबंध पुढे येऊ शकतात. म्हणूनच अशोक खरात याला संपवण्याचा कट रचला जाऊ शकतो, असा दावा तृप्ती देसाई यांनी केला. तसेच मला नाशिकहून काही पीडित महिलांचा फोन आला होता. 24 मार्चपर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी मिळालेली आहे. 24 तारखेला त्याला न्यायालयापुढे हजर करताना त्याचे एन्काऊंटर होऊ शकते. हे प्रकरण पूर्णपणे बंद केले जाऊ शकते, अशीही पुष्टी त्यांनी जोडली.
एन्काऊंटर करण्याचा डाव असेल तर…
अशोक खरातने मोठा कांड केलेला आहे. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केलेले आहे. त्याला तातडीने संपवून चालणार नाही. त्याला प्रत्येक दिवशी शिक्षा मिळाली पाहिजे. त्याचे एन्काऊंटर करण्याचा डाव असेल तर तो उधळून लावला पाहिजे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी केली.
