AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Lockdown : औरंगाबादेतील लॉकडाऊनमध्ये बदल, पेट्रोल पंप आणि हॉटेल्ससाठी नवी नियमावली

औरंगाबादेतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 30 तारखेच्या मध्यरात्रीपासून 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यात आता काहीसा बदल करण्यात आला आहे.

Aurangabad Lockdown : औरंगाबादेतील लॉकडाऊनमध्ये बदल, पेट्रोल पंप आणि हॉटेल्ससाठी नवी नियमावली
Lockdown
sagar joshi
sagar joshi | Updated on: Mar 29, 2021 | 11:01 PM
Share

औरंगाबाद : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. औरंगाबादेतील रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढतेय. औरंगाबादेतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 30 तारखेच्या मध्यरात्रीपासून 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यात आता काहीसा बदल करण्यात आला आहे. आता हा लॉकडाऊन 31 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान असणार आहे. यात पेट्रोल पंप आणि हॉटेल्ससाठी काही नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.(Changes in lockdown in Aurangabad district, some relief to petrol pumps and hoteliers)

नव्या नियमावलीनुसार लॉकडाऊनच्या काळात सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल उपलब्ध असणार आहे. तसंच हॉटेलमध्येही रात्री 8 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी देऊ शकणार आहेत. प्रशासनाच्या सुधारित आदेशानुसार लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत इंधन उपलब्ध असेल. तर 12 नंतर फक्त अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवल्यानंतर इंधन मिळेल. त्याचबरोबर शहरात होम आयसोलेशनची संख्या मोठी असल्यानं हॉटेल्सना रात्री 8 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करण्याची मुभा देण्यात आली आहे.

लॉकडाऊन दरम्यान शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. चौकाचौकात, गल्लीबोलात पोलिस पेट्रोलिंग करतील. त्याचबरोबर 16 पोलीस ठाण्याअंतर्गत ठराविक चौकात पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. यावेळी पोलिसांच्या मदचतीला होमगार्डही असणार आहेत.

इम्तियाज जलील यांचा लॉकडाऊनला विरोध

औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोठा विरोध होत आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाला AIMIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लावणं म्हणजे उद्योजकांना खुश करण्याचा प्रयत्न असल्याची टीका जलील यांनी केली आहे.

औरंगाबाज जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाविरोधात इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 31 मार्च रोजी लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा जलील यांनी केलीय. या आंदोलनावेळी वैद्यकीय विभागात तातडीने भरती करण्यात यावी अशी मागणीही केली जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं 30 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्याला जलील यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

काय सुरु राहणार?

औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊनमधून उद्योग क्षेत्राला वगळण्यात आलं आहे. सर्व उद्योग आणि त्याचे पुरवठादार नियमानुसार काम करतील. औद्योगिक वस्तूंचा पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी स्थानिक, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानुसार सुरु राहणार आहे. त्याचबरोबर वृत्तपत्रे, नियतकालिकांची छपाई आणि वितरण सुरु राहील. डिजिटल आणि प्रिंट मीडिया यांची कार्यालयेही शासकीय नियमानुसार सुरु राहणार आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा असे आदेशही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

Aurangabad Lockdown : ‘उद्योजकांना खुश करण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय’, इम्तियाज जलील यांचा आंदोलनाचा इशारा

Aurangabad corona Update : घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल, एका बेडवर 3 रुग्ण!

Changes in lockdown in Aurangabad district, some relief to petrol pumps and hoteliers

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत