AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद शहरात धावणार 9 नव्या स्मार्ट सिटी बस, प्रवाशांकडून त्रुटी जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअॅप सुविधा

औरंगाबाद शहराला स्मार्ट सिटी बनवण्याच्या उद्देशानं सुरु करण्यात आलेल्या सिटी बसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील स्मार्ट सिटीबसची संख्या 9 ने वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

औरंगाबाद शहरात धावणार 9 नव्या स्मार्ट सिटी बस, प्रवाशांकडून त्रुटी जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअॅप सुविधा
औरंगाबाद सिटी बस
| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 12, 2021 | 10:05 AM
Share

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता कमी झालाय. रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही घट झालीय. अशावेळी औरंगाबाद शहराला स्मार्ट सिटी बनवण्याच्या उद्देशानं सुरु करण्यात आलेल्या सिटी बसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील स्मार्ट सिटी बसची संख्या 9 ने वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या नव्या बसेससह शहरातील सिटी बसची संख्या आता 41 वर पोहोचली आहे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर महापालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने 8 जूनपासून सिटीबस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. (Big response to city bus in Aurangabad city, 9 new city buses for citizens)

सुरुवातीच्या टप्प्यात 8 बस सुरु करण्यात आल्या. त्यानंतर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अजून 9 सिटीबस सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून ही माहिती देण्यात आलीय. सुरक्षित आणि जल प्रवासासाठी सिटी बस उपयुक्त ठरत आहेत. प्रवाशांना येणाऱ्या अडचणी आणि त्रुटी व्हॉट्सअपच्या माध्यमातून मांडण्याचा पर्यायही महानगरपालिकेनं दिला आहे.

नव्या गाड्यांचे मार्ग –

मार्ग क्रमांक 25, सिडको ते रांजणगावमार्गे हर्सुल टी पॉईंट, दिल्लीगेट, मध्यवर्ती बसस्थानक. या मार्गावरल पहाटे सव्वा सहा वाजता पहिली बस असेल. तर शेवटची बस रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी असेल. मार्ग क्र. 22 सिडको ते रांजणगावमार्गे बजरंग चौक, बळीराम पाटील शाळा, टीव्ही सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्त बसस्थानक अशी असेल. मार्ग क्र- 15, सिडको ते रांजणगावमार्गे जयस्वाल हॉल, टीव्ही सेंटर, गोदावरी पब्लिक स्कूल, हिमायत बाग, दिल्ली गेट, मध्यवर्ती बसस्थानक असा प्रवास करेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं चूक सुधारली

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.कॉमच्या 11 हजार विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. बी. कॉमचे 11 हजार विद्यार्थी अखेर उत्तीर्ण झाले आहेत. अकरा हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यामुळं मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अखेर कुलगुरुंनी या प्रकरणी लक्ष घातल्यानंतर बी.कॉमच्या अकरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आलं आहे.

कसा घडला प्रकार?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. कॉमच्या परीक्षेला बसलेल्या 11321 विद्यार्थ्यांची घेतली होती परीक्षा त्यांच्यातील 11137 अनुत्तीर्ण झाल्याची कुलगुरूंकडे आली होती. औरंगबादमधील विद्यार्थी संघटनांनी याप्रश्नी कुलगुर डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेत हा प्रश्न मांडला होता. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आलं नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.एवढ्या मोठ्य़ा संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानं यावरुन गोंधळ देखील झाला होता. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटरच्या चुकीमुळं हा गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

Video : औरंगाबादेत ऑईल गळती, तेल गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड!

नियुक्त्या द्या अथवा सामुदायिक आत्महत्येची परवानगी द्या; एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

Big response to city bus in Aurangabad city, 9 new city buses for citizens

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली