औरंगाबाद नामकरणाचा वाद पेटला, ‘लव्ह औरंगाबाद’ फलकाची तोडफोड

औरंगाबादमधील 'लव्ह औरंगाबाद' या सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. (Love Aurangabad Board Vandalized )

औरंगाबाद नामकरणाचा वाद पेटला, 'लव्ह औरंगाबाद' फलकाची तोडफोड
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 11:50 AM

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये शहराच्या नावावरून वाद पुन्हा पेटला आहे. लव्ह औरंगाबाद या सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. औरंगाबद शहराच्या नावावरुन गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि एमआयएमच्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले होते.(Love Aurangabad Board Vandalized by Unknown Persons in Aurangabad )

लव्ह औरंगबाद सेल्फी पॉईंटची तोडफोड

औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून शहराच्या नावाच्या वादानं तोंड वर काढलं आहे. शहरातील छावणी परिसरात लव्ह औरंगाबाद हा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. (Love Aurangabad Board Vandalized by Unknown Persons in Aurangabad )

लव्ह औरंगाबाद आणि सुपर संभाजीनगर वाद

स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंग मध्ये संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराचं पूर्वीचं नाव असलेलं खडकी, औरंगाबादचे फलक लावण्यात आले. त्यात आय लव्ह औरंगाबाद, लव्ह प्रतिष्ठान, लव्ह खडकी असे डिस्प्ले लावून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठाने शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ “सुपर संभाजीनगर” असा डिस्प्ले तयार केला होता.

खासदार इम्तियाज जलील यांची टीका

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर टीका करत निवडणुकीच्या तोंडावर राजकारण होत असल्याचा आरोप केला होता. इम्तियाज जलील यांनी ट्विटर पोस्ट टाकत शिवसेना चिप राजकारण करत असल्याचा आरोप केलेला. दर पाच वर्षांनी शिवसेना आणि भाजप हा विषय पुढे आणतात. पाणी, स्वच्छता, रस्ते आणि रोजगार या विषयाबद्दल भाजप आणि शिवसेना काही बोलत नाहीत, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली होती. गेल्या 30 वर्षांपासून औरंगाबादमध्य शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. तीस वर्षात महापालिकेने शहरासाठी केलेले रचनात्मतक काम दाखवण्यासाठी नसल्यामुळं ते शहराच्या नावाचे राजकारण करत आहेत, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.

औरंगाबादचे सुपर संभाजीनगर करणार असं वक्तव्य पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 9 डिसेंबरला केले होते. सुभाष देसाई औरंगाबादला विकासकामांचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही भूमिका मांडली होती.

संबंधित बातम्या:

औरंगाबादच्या नामकरणाचा पुन्हा वाद , MIMचं शिवसेनेवर टीकास्त्र

Subhash Desai | औरंगाबादचे सुपर संभाजीनगर करणार, सुभाष देसाईंचं वक्तव्य

(Love Aurangabad Board Vandalized by Unknown Persons in Aurangabad )

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.