AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादमध्ये पहिल्याच पावसात अजिंठा आणि वेरुळचे धबधबे सुरु, कोल्हापूरमध्येही दमदार पाऊस

धबधब्यांच्या बॅक वॉटर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने वेरुळ लेणीतील नर आणि मादी धबधबे आणि अजिंठा लेणीतील वाघूर धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे (Aurangabad Verul Ajantha Waterfall).

औरंगाबादमध्ये पहिल्याच पावसात अजिंठा आणि वेरुळचे धबधबे सुरु, कोल्हापूरमध्येही दमदार पाऊस
| Updated on: Jun 16, 2020 | 8:54 AM
Share

मुंबई : मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केल्यापासून राज्यातील विविध भागात पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी हलक्या सरी, तर काही ठिकाणी काहीशी विश्रांती घेऊन पावसाने दमदार हजेरी लावणं सुरुच ठेवलं आहे. औरंगाबादमध्ये तर पहिल्याच पावसात जगप्रसिद्ध वेरुळ-अजिंठा लेण्यांजवळी धबधबे सुरु झाले आहेत. धबधब्यांच्या बॅक वॉटर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने वेरुळ लेणीतील नर आणि मादी धबधबे आणि अजिंठा लेणीतील वाघूर धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे (Aurangabad Verul Ajantha Waterfall). दुसरीकडे कोल्हापूर आणि बीडमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

कोल्हापूरमध्ये काल (15 जून) दिवसभराच्या विश्रांतीनंतर पावसाने आज जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली. शहरासह उपनगरामध्ये पावसाच्या हलक्या सरी झाल्या, तर पश्चिम भागात दमदार पाऊस पाहायला मिळाला. पेरणीनंतर समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे. विशेष म्हणजे पावसाने झाडं पडून फोंडाघाट-कोल्हापूर मार्ग बंद झाला आहे.

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने फोंडाघाट-पाचोबा देवस्थानाजवळ रस्त्यावर भले मोठे झाड पडले. त्यामुळे कोल्हापूरकड़े जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रात्री 1 च्या सुमारास हे भले मोठे झाड रस्त्यावर कोसळले. फोंडाघाट-कणकवली आणि फोंडाघाट-कोल्हापूर वाहतूक रात्रीपासून ठप्प झाली आहे. विद्युत ताराही मोठ्या प्रमाणात तुटून पडल्या आहेत. 16 ते 18 जूनपर्यंत कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कालपासूनच पावसाने जोर धरला असला, तरी आज सकाळ पासून पाऊस थांबून थांबून पडत आहे. काल भुईबावडा घाटातही दरड कोसळल्याची घटना घडली.

बीड जिल्ह्यात सोमवारी (15 जून) दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील आष्टी, गेवराई, बीड, परळी आणि माजलगाव या तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं. मृग नक्षत्रानंतर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस बरसतोय. त्यामुळेच आता शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केलीय. बीड तालुक्यातील नाळवंडी, जरुड, पिंपळनेर परिसरात मुसळधार सरी कोसळल्या. या पावसात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मात्र काही प्रमाणात नुकसान झालंय. अनेकांच्या शेतात पाणी साचलं आहे. समाधानकारक बरसणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यातही पावसाने चांगलेच झोडपले. सोमवारी (15 जून) संध्याकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील धोत्रे गावात पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. अख्या गावाला पाण्याचा वेढा बसला होता. दोन तास चाललेल्या पावसानं या परिसरात प्रचंड नुकसान केलं. गावातील सर्वच घरांमध्ये व शेतीत पाणी साचलं. ढग फुटीसारखा पाऊस पडल्याने गाव अगदी जलमय झालं आहे. यानंतर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हेही या गावाकडे रवाना झाले.

संबंधित बातम्या :

Maharashtra Monsoon Rain | मुंबई, पुण्यात मान्सूनची हजेरी, पुढील पाच दिवस कुठे-कुठे पावसाची शक्यता?

Nagpur Rain | पावसाळ्याआधीच नागपूर मनपा सज्ज, प्रथमच ‘इन्सिडंट रिस्पॉन्स टीम’ तैनात

Raigad Rain | रायगडच्या खोपोली, खालापूरमध्ये दमदार पाऊस

Aurangabad Verul Ajantha Waterfall

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.