AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात 9 टन लिंबाची लाकडे, 3 लाखांचा मुद्देमाल ताब्यात, वनविभागाची कारवाई

जालनाः जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील (Jalna Ambad) धाकलगाव शिवारात रात्रीच्या वेळी लिंबाच्या झाडाची अवैध वृक्षतोड सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. बुधवारी मध्यरात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वृक्षतोडीवर कारवाई करयात साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अंदाजे पन्नास हजार रुपये किंमतीची 9 टन लिंबाची लाकडे व तीन लाख रुपये किंमतीचे आयशर वाहन असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल […]

जालन्यात 9 टन लिंबाची लाकडे, 3 लाखांचा मुद्देमाल ताब्यात, वनविभागाची कारवाई
जालन्यात 9 टन लिंबाचे लाकूड जप्त
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 3:39 PM
Share

जालनाः जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील (Jalna Ambad) धाकलगाव शिवारात रात्रीच्या वेळी लिंबाच्या झाडाची अवैध वृक्षतोड सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. बुधवारी मध्यरात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वृक्षतोडीवर कारवाई करयात साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अंदाजे पन्नास हजार रुपये किंमतीची 9 टन लिंबाची लाकडे व तीन लाख रुपये किंमतीचे आयशर वाहन असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन व्यापारी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

अंबडमध्ये सर्रास सुरु होती वृक्षतोड

जालना जिल्ह्यातील अंबड परिसरात गेल्या काही दिवसांपासून खुलेआम वनसंपदा नष्ट होत आहे. लिंबाचे झाड तोडण्यास कायद्याने बंदी असतानान इतर जिल्ह्यांतून येऊन अंबड तालुक्यात बस्तान मांडून काही व्यापाऱ्यांनी सर्रास वृक्षतोड सुरु ठेवली होती. विशेष करून रात्रीच्या वेळी जास्त वृक्षतोडीची वाहतूक असते. या व्यापाऱ्यांना कोणाचा वरदहस्त लाभलेला आहे, या प्रश्नच आहे. पोलिसांनी अनेक वेळा अवैध वाहतूक करणारी वाहने पकडली आणि जप्त केली. परंतु कुठेही वृक्षतोड थांबण्याचे नाव घेत नाही. वन विभाग याकडे सर्रास डोळेझाक करत असल्यानेच व्यापाऱ्यांचे अधिक मनोबल वाढत आहे, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

धाकलगाव शिवारात डाव्या कालव्याजवळ कारवाई

अंबडमधील धाकलगाव शिवारात डाव्या कालव्याजवळ लिंबाचे लाकूड तोडून एक आयशर ट्रक भरून जात होता. रात्रीच्या वेळी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी मनकवार, वनपरिक्षेत्र अधिकारी अभय अटकळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत लाकूड आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला असून औरंगाबादचे लाकूड व्यापारी मन्सूर व अल्ताफ हे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

इतर बातम्या-

राज्यात 7 महिन्यात 8 हजार प्राध्यापकांची भरती पूर्ण करणार, तर 5 हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन, उदय सामंतांची घोषणा

ED च्या कारवाईने औरंगाबादेत खळबळ, उद्योजक-राजकारण्यांचे धाबे दणाणले, जालना-लातुरातही धाडसत्र

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.