AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात 7 महिन्यात 8 हजार प्राध्यापकांची भरती पूर्ण करणार, तर 5 हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन, उदय सामंतांची घोषणा

राज्यात 8 हजार प्राध्यापकांची भरती 7 महिन्यात पूर्ण केली जाईल. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून हे प्राध्यापक रुजू होतील, असं सामंत यांनी जाहीर केलं. विद्यापीठ महाविद्यालयांना पत्र पाठवून अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करण्यासाठी सूचना करेल, असं आश्वासनही सामंत यांनी दिलं आहे.

राज्यात 7 महिन्यात 8 हजार प्राध्यापकांची भरती पूर्ण करणार, तर 5 हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन, उदय सामंतांची घोषणा
उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: sagar joshi | Updated on: Nov 12, 2021 | 4:58 PM
Share

औरंगाबाद : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्राध्यापक भरतीबाबत मोठी घोषणा केलीय. राज्यात प्राध्यापक आणि प्राचर्य भरतीला मंजुरी मिळाली आहे. तसंच 5 हजार हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करु, अशी घोषणाच उदय सामंत यांनी केली आहे. राज्यात 8 हजार प्राध्यापकांची भरती 7 महिन्यात पूर्ण केली जाईल. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून हे प्राध्यापक रुजू होतील, असं सामंत यांनी जाहीर केलं. विद्यापीठ महाविद्यालयांना पत्र पाठवून अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करण्यासाठी सूचना करेल, असं आश्वासनही सामंत यांनी दिलं आहे. (Uday Samant’s announcement regarding recruitment of professors)

राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून केली जात आहे. यासाठी राज्यात पुणे, मुंबई तसेच इतर जिल्ह्यांत आंदोलनदेखील करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्राध्यापक भरतीबाबत महत्वनाचा निर्णय घेतला आहे दोन दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे त्याबाबत महत्वाची माहिती दिली होती. राज्यात पहिल्या टप्यातील 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्याला मान्यता देण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं होतं.

उदय सामंतांचे ट्विट

मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आज प्राध्यापकांच्या पहिल्या टप्यातील 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्याला मान्यता देण्यात आली आहे, असं ट्वीट सामंत यांनी केलं होतं.

प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरु होण्याची प्रतीक्षा

दरम्यान, राज्यात गेल्या अकरा वर्षांपासून प्राध्यापक भरती नियमितपणे झालेली नाही. राज्यातील महाविद्यालयातील पन्नास टक्के जागा रिक्त असल्यानं शिक्षणावर परिणाम होत आहे. सेट नेट परीक्षांचं आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. आता मात्र उशिराने का होईना पण प्राध्यापक भरतीला मान्यता मिळालेली आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून आता प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरु होण्याची वाट पाहिली जात आहे.

इतर बातम्या : 

सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन नवे वादंग! संजय राऊतांची जहरी टीका; तर तक्रार दाखल करण्यासाठी भाजप आक्रमक

ED च्या कारवाईने औरंगाबादेत खळबळ, उद्योजक-राजकारण्यांचे धाबे दणाणले, जालना-लातुरातही धाडसत्र

Uday Samant’s announcement regarding recruitment of professors

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...