AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर पदवी प्रवेश प्रक्रियेला वेग, 22 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश देणार

विद्यापीठातील 65 पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रियेने वेग घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी 20 ऑक्टोबरला समुपदेशन फेरी होईल. त्यासाठी 4 हजार 16 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर पदवी प्रवेश प्रक्रियेला वेग, 22 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश देणार
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 12:47 PM
Share

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी प्रवेशाला बुधवारपासून म्हणजेच 20 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. कागदपत्र पडताळणी, समुपदेशन करून प्रवेश निश्चितीसाठी नाट्यगृहात विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 20 ते 22 ऑक्टोबरदरम्यान प्रवेश प्रकिया पूर्ण केली जाईल.

 65 पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश

विद्यापीठातील 65 पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रियेने वेग घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी 20 ऑक्टोबरला समुपदेशन फेरी होईल. त्यासाठी 4 हजार 16 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पूर्वतयारीसाठी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट यांच्या अध्यक्षतेत सोमवारी महात्मा फुले सभागृहात बैठक झाली. 16 ते 18 ऑक्टोबर आक्षेप, हरकती पदव्युत्तर विभागाने मेलद्वारे स्वीकारल्या गेल्या. आलेल्या 900 तक्रारींचा निपटारा करून अंतिम प्रवेश यादी सोमवारी सायंकाळी संकेतस्थळावर जाहीर होणार आहे.

29 ऑक्टोबरला स्पॉट अ‍ॅडमिशन

29 ऑक्टोबरला स्पॉट ॲडमिशन घेता येईल. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विविध अभ्यासक्रमांसाठी 2 हजार 448 जणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेसाठी 289 जणांनी नोंदणी केली. मानवविज्ञानच्या अभ्यासक्रमासाठी 846 तर आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील अभ्यासक्रमासाठी 463 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचे संपर्क कार्यालय सुरु

महात्मा ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पर्यायी संस्कृतीची अपरिहार्यता व्यक्त केली होती. याच प्रेरणेतून औरंगाबाद येथे 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी पहिल्या परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच या साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, दीपक बनसोडे, सुमित भुईगळ, मुख्य संयोजक समाधान दहिवाळ, स्वागताध्यक्ष प्रकाश इंगळे, संयोजन समितीचे सदस्य प्राचार्य हसन इनामदार, भरत हिवराळे, भूषण चोपडे, स्वप्निल काळे आदींची उपस्थिती होती. महात्मा ज्योतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पर्यायी संस्कृतीची अपरिहार्यता व्यक्त केली होती. परिवर्तनवादी भूमिका घेऊन लेखन करणाऱ्या लेखकांना प्रस्थापित साहित्य व्यवहार समावून घेत नाही. त्यामुळे या समूहातील लेखकांच्या अभिव्यक्तीची गळचेपी होते, त्यांचा आवाज दाबला जातो. म्हणूनच शोषित, वंचित घटकातील लेखकांसाठी स्वतंत्र विचार मंचाची आवश्यकता आहे, असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी मांडले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.