AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर पदवी प्रवेश प्रक्रियेला वेग, 22 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश देणार

विद्यापीठातील 65 पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रियेने वेग घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी 20 ऑक्टोबरला समुपदेशन फेरी होईल. त्यासाठी 4 हजार 16 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर पदवी प्रवेश प्रक्रियेला वेग, 22 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश देणार
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 19, 2021 | 12:47 PM
Share

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी प्रवेशाला बुधवारपासून म्हणजेच 20 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. कागदपत्र पडताळणी, समुपदेशन करून प्रवेश निश्चितीसाठी नाट्यगृहात विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 20 ते 22 ऑक्टोबरदरम्यान प्रवेश प्रकिया पूर्ण केली जाईल.

 65 पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश

विद्यापीठातील 65 पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रियेने वेग घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी 20 ऑक्टोबरला समुपदेशन फेरी होईल. त्यासाठी 4 हजार 16 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पूर्वतयारीसाठी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट यांच्या अध्यक्षतेत सोमवारी महात्मा फुले सभागृहात बैठक झाली. 16 ते 18 ऑक्टोबर आक्षेप, हरकती पदव्युत्तर विभागाने मेलद्वारे स्वीकारल्या गेल्या. आलेल्या 900 तक्रारींचा निपटारा करून अंतिम प्रवेश यादी सोमवारी सायंकाळी संकेतस्थळावर जाहीर होणार आहे.

29 ऑक्टोबरला स्पॉट अ‍ॅडमिशन

29 ऑक्टोबरला स्पॉट ॲडमिशन घेता येईल. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विविध अभ्यासक्रमांसाठी 2 हजार 448 जणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेसाठी 289 जणांनी नोंदणी केली. मानवविज्ञानच्या अभ्यासक्रमासाठी 846 तर आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील अभ्यासक्रमासाठी 463 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचे संपर्क कार्यालय सुरु

महात्मा ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पर्यायी संस्कृतीची अपरिहार्यता व्यक्त केली होती. याच प्रेरणेतून औरंगाबाद येथे 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी पहिल्या परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच या साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, दीपक बनसोडे, सुमित भुईगळ, मुख्य संयोजक समाधान दहिवाळ, स्वागताध्यक्ष प्रकाश इंगळे, संयोजन समितीचे सदस्य प्राचार्य हसन इनामदार, भरत हिवराळे, भूषण चोपडे, स्वप्निल काळे आदींची उपस्थिती होती. महात्मा ज्योतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पर्यायी संस्कृतीची अपरिहार्यता व्यक्त केली होती. परिवर्तनवादी भूमिका घेऊन लेखन करणाऱ्या लेखकांना प्रस्थापित साहित्य व्यवहार समावून घेत नाही. त्यामुळे या समूहातील लेखकांच्या अभिव्यक्तीची गळचेपी होते, त्यांचा आवाज दाबला जातो. म्हणूनच शोषित, वंचित घटकातील लेखकांसाठी स्वतंत्र विचार मंचाची आवश्यकता आहे, असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी मांडले.

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं