AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमीः औरंगबादेत जानेवारी महिन्यात अजिंठा महोत्सव! जगविख्यात लेणी परिसरात घुमणार सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूर!

अस्सल शास्त्रीय-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देत वेरूळ-अजिंठ्याकडे अवघ्या जगाचे लक्ष वेधणारा औरंगाबादचा वेरूळ महोत्सव बंद होऊन 5 वर्ष झालीत. आता ही मरगळ झटकण्याचं प्रशासनाने ठरवलं असून येत्या जानेवारी महिन्यात अजिंठा महोत्सव आयोजनाची तयारी सुरु आहे.

मोठी बातमीः औरंगबादेत जानेवारी महिन्यात अजिंठा महोत्सव! जगविख्यात लेणी परिसरात घुमणार सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूर!
संग्रहित छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 16, 2021 | 7:00 AM
Share

औरंगबाादः ऐतिहासिक लेण्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या औरंगाबादच्या वेरुळ महोत्सवात (Ellora Festival) 2017 पासून खंड पडलाय. त्यातच कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून पर्यटन क्षेत्राची अवस्था कोलमडल्यासारखी झाली आहे. पर्यटनाला आणि एकूणच ऐतिहासिक औरंगाबाद नगरीला उभारी देण्यासाठी यंदा जानेवारी महिन्यात भव्य अशा अजिंठा महोत्सवाचे (Ajanta Festival) आयोजन करण्यात येणार आहे. महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याविषयीच्या सूचना विभागीय आयुक्तालयातील बैठकीत दिल्या. तसेच पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन मिळण्यासाठी या महोत्सवाचे काटेकोरपणे नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दिल्या.

बचतगटनिर्मित उत्पदनांचे ‘सरस’ प्रदर्शन

मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, हे वर्ष आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर अजिंठा लेणी परिसरात महिला समूहाच्या उत्पादनांचे सरस प्रदर्शनाचे आयोजन करावे. त्यासोबतच पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी लेणी परिसरात यंदा अजिंठा महोत्सव भरवण्यात यावा. या प्रदर्शनासह महोत्सवासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेने निधीसह परिपूर्ण नियोजन करून प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

…तर दरवर्षी आता अजिंठा महोत्सवच!

औरंगाबादच्या सांस्कृतिक ठेव्याची आठवण करून देणारा वेरूळ-अजिंठा महोत्सवाच्या परंपरेत 2017 नंतर खंड पडला होता. 2016 साली हा महोत्सव घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यात ब्रेक लागला होता. यंदाही वेरूळ-अजिंठा ऐवजी अजिंठा महोत्सवाचेच नियोजन केले जाणार आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव यशस्वी झाला तर दरवर्षी अजिंठा महोत्सव घेतला जाईल, असे संकेतही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.

इतर बातम्या-

Obc reservation : सरकारच्या नौटंकीचा पर्दाफाश, शकूनी काकाच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार-पडळकर

Pankaja Munde on OBC Reservation | सरकारमधीलच ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडलीय की काय? पंकजांचा सवाल

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक