AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अटकेचा विषय निघताच करुणा मुंडेंना अश्रू अनावर, सत्ताधाऱ्यांकडून आवाज दाबला जातोय, औरंगाबादेत टीकास्त्र

पती सत्ताधारी पक्षात असल्याने माझा आवाज दाबण्यासाठी ते सगळीकडून प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. कोरोनाचे सर्व नियम पाळून बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही त्रास दिला जात आहे, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला.

अटकेचा विषय निघताच करुणा मुंडेंना अश्रू अनावर, सत्ताधाऱ्यांकडून आवाज दाबला जातोय, औरंगाबादेत टीकास्त्र
औरंगाबादेत करुणा मुंडे यांना अश्रू अनावर
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 11:04 AM
Share

औरंगाबादः सामाजिक कार्यकर्त्या आणि शिवशक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करुणा मुंडे (Karuna Munde) या काल औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेणार होत्या. मात्र ऐनवेळी पोलिसांनी या बैठकीसाठी परवानगी नाकारली. त्यामुळे लोकशाही प्रधान देशात एका महिलेवर सत्ताधाऱ्यांकडून दडपशाही करून रोखले जात आहे, असा गंभीर आरोप करुणा शर्मा-मुंडे यांनी केला. राजकारणात सक्रीय होण्यासाठी करुणा मुंडे यांनी शिवशक्ती सेना पक्षाची स्थापना केली आहे.

पक्ष बांधणीसाठी राज्यभर दौरे

करुणा मुंडे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या शिवशक्ती सेना पक्षाच्या बांधणीसाठी मी राज्यभर दौरे सुरु केले आहे. पक्षाच्या माध्यमातून महिला, शेतकरी, ऊसतोड कामगार, एसटी कामगार यांचे प्रश्न सोडवण्यात येणार आहे. यासाठी मी कार्यकर्त्यांचे जाळे उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही हितशत्रू जाणूनबुजून मला रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी घराणेशाही संपवली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आम्ही राजकीय घराणेशाही संपवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. त्यांचा प्रश्न आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडेही सत्ताधारी दुर्लक्ष करीत आहेत. पक्षाच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवणार असल्याची भूमिका करुणा मुंडे यांनी मांडली.

विषय निघताच अश्रू अनावर

बीड येथे कारमध्ये पिस्तूल सापडल्या प्रकरणी अटक झाल्याचा विषय निघताच करुणा मुंडे यांना अश्रू अनावर झाले. जेलमधील ते दिवस कधीही विसरणार नाही, असी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच कौटुंबिक कलहावर मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांची भेट झाली नाही, असे करुणा मुंडे यांनी सांगितले. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी बोलण्याचेही त्यांनी टाळले.

पती सत्ताधारी, आवाज दाबण्याचे प्रयत्न- करुणा मुंडे

राजकीय दौऱ्याच्या निमित्ताने 25 वर्षानंतर आपण घराबाहेर पडल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले. तसेच माझा कुणालाही विरोधा नाही. मात्र पती सत्ताधारी पक्षात असल्याने माझा आवाज दाबण्यासाठी ते सगळीकडून प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. कोरोनाचे सर्व नियम पाळून बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही त्रास दिला जात आहे, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला.

इतर बातम्या-

Tallest rideable bicycle : अशी बनवली सायकल, की जिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली दखल!

Bachchan Pandey : अखेर…चाहत्यांची आतुरता संपली, अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट या तारखेला होतोय रिलीज!

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.