AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करमाफीच्या आशेनं वसुली मंदावली, औरंगाबाद महापालिकेच्या मोहिमेत खोडा, थकबाकीदार रडारवर!

महापालिका प्रशासनाने 1 एप्रिल ते 30 डिसेंबर 2021 पर्यंत मालमत्ता कर तसेच पाणीपट्टीसाठी तब्बल 100 कोटी रुपयांची वसुली केकली. डिसेंबर महिन्यापर्यंत एवढी वसुली कधीच झाली नव्हती. तसेच 1 जानावेराी ते 1 फेब्रुवारीपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ताकर, पाणीपट्टीपोटी फक्त 11 कोटी रुपये आले.

करमाफीच्या आशेनं वसुली मंदावली, औरंगाबाद महापालिकेच्या मोहिमेत खोडा, थकबाकीदार रडारवर!
| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 12:52 PM
Share

औरंगाबादः राज्यातील आगामी महापालिका निवडणुका (Municipal corporation election) डोळ्यासमोर ठेवून मुंबई, नवी मुंबई येथील 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्ताधारकांना कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राज्यातील सर्वच शहरांमध्ये अशी करमाफी दिली जाईल, असे वक्तव्य औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी केले होते. त्यामुळे आपालही कर माफ होणार, असे औरंगाबादकरांना वाटतेय. म्हणून मागील एक महिन्यापासून मालमत्ताधारक (Property owners) महापालिकेकडे कर भरायलाच तयार नाहीत. त्यामुळे महापालिकेची कर वसुलीची मोहीम चांगलीच थंडावली आहे. तसेच महापालिका प्रशासन आता कोंडीत सापडले आहे.

पालकमंत्र्यांनी लावलं आशेला

मुंबईप्रमाणेच औरंगाबादेतही कर वसुलीचा निर्णय होणार का, या प्रश्नावर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी राज्य सरकारचा तसा विचार सुरु आहे, असं वक्तव्य केलं होतं. मात्र त्यानंतर राज्य सरकारतर्फे कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. कर माफी देण्यास महापालिकेचाही विरोध आहे. कर माफ केला तर शासनाने तेवढे अनुदान महापालिकेला दरवर्षी द्यावे, अशी मागणी करण्यात आली. एवढी मोठी रक्कम शासन देणार नाही. त्यामुळे करमाफीचा मुद्दा हा केवळ निवडणुकीपुरता वापरला जाण्याची चिन्हे आहेत.

आतापर्यंत किती वसुली?

महापालिका प्रशासनाने 1 एप्रिल ते 30 डिसेंबर 2021 पर्यंत मालमत्ता कर तसेच पाणीपट्टीसाठी तब्बल 100 कोटी रुपयांची वसुली केकली. डिसेंबर महिन्यापर्यंत एवढी वसुली कधीच झाली नव्हती. तसेच 1 जानावेराी ते 1 फेब्रुवारीपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ताकर, पाणीपट्टीपोटी फक्त 11 कोटी रुपये आले. जानेवारी महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक पहायला मिळाला. त्यामुळे महापालिकेच्या वसुलीवर परिणाम झाला. लॉकडाऊन लागेल, या भीतीपोटी व्यापाऱ्यांनीही कर भरण्याकडे दुर्लक्ष केले. शहरात 600 चौरस फुटांच्या मालमत्तांची संख्या सर्वाधिक आहे. मालमत्ता कर जिना, शौचालय, बाथरुम इत्यादी परिसरांना लावण्यात येत नाही. त्यामुळे फक्त 600 पैकी 500 चौरस फुटांना कर लावण्यात येतो.

थकबाकीचा आकडा किती?

औरंगाबादमधील थकबाकीचा आकडा 878 कोटींपर्यंत पोहोचला आहे. करमूल्य निर्धारण अधिकारी अपर्णा थेटे यांनी बुधवारी वॉर्ड अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात आता मोठ्या थकबाकीदारांना रडारवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इतर बातम्या-

बुफेच्या रांगेत पदर पेटला, 54 वर्षीय विवाहितेचा होरपळून मृत्यू, फाईव्ह स्टार हॉटेलमधील प्रकार

Priyanka Chopra : आई झाल्यानंतर प्रियांका चोप्राचा पहिला फोटो, पोस्ट शेअर करत म्हणाली…

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.