AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबादेत हेल्मेट घालणाऱ्यांचा सत्कार, दुर्लक्ष करणाऱ्यांना सक्ती, काय आहे नवा नियम?

हेल्मेट न वापरल्यामुळे किरकोळ अपघातातही डोक्याला मार लागल्यास गंभीर दुखापत किंवा मृत्यू होण्याचा धोका असतो. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी हेल्मेट वापरणाऱ्यांचा सत्कार करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतला आहे.

Aurangabad | औरंगाबादेत हेल्मेट घालणाऱ्यांचा सत्कार, दुर्लक्ष करणाऱ्यांना सक्ती, काय आहे नवा नियम?
सांकेतिक छायाचित्र
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 27, 2022 | 6:00 AM
Share

औरंगाबादः औरंगाबाद शहरातील वाहतूक पोलिसांनी (Traffic police) हेल्मेट सक्तीचे धोरण अधिक कठोरतेने अंमलात आणायचे ठरवले आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारीही सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये (Government offices) हेल्मेट न घालता येणारे कर्मचारी, अधिकारी आणि नागरिकांना प्रवेश मिळणार नाही, असे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. तर याउलट हेल्मेटचे महत्त्व जाणून दुचाकीवर (Two Wheelaers) सदैव हेल्मेट घालून फिरणाऱ्या नागरिकांचा वाहतूक पोलिसांतर्फे सत्कारही केला जाणार आहे. याद्वारे एक साकात्मक संदेश प्रशासनातर्फे समाजात दिला जाईल. त्यामुळे हेल्मेट घालणाऱ्यांचा सत्कार आणि न घालणाऱ्यांना सक्ती असे दोन प्रकार शहरात येत्या काही दिवसात पहायला मिळतील.

हेल्मेट सक्तीसाठी काय आदेश?

राज्य परिवहन मंडळ आणि पोलिसांनी हेल्मेटविषयी जनजागृती करावी, त्यानंतर कारवाई करावी असे असे आदेश देण्यात आले आहेत. हेल्मेट सक्तीसाठी परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी 22 मार्च रोजी हे आदेश काढले आहेत. शासकीय कार्यालयात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी किंवा नागरिक अशा प्रत्येक दुचाकी चालकाला हेल्मेटशिवाय प्रवेश देऊ नये, हेल्मेट नसल्यास कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनातर्फेही हेल्मेटचा वापर वाढण्यासाठी प्रबोधन सुरु करावे, असे सांगण्यात आले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्थांनाह सहभागी करून घ्यावे आणि त्यानंतर कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे.

शहर पोलिसांकडून हेल्मेटधारकांचा सत्कार

दरम्यान, शहरात हेल्मेट न घालणाऱ्यांवर जशी दंडात्मक कारवाई होणार आहे, त्याचप्रमाणे हेल्मेट घालणाऱ्यांचा सत्कार करण्याची योजनाही शहर पोलिसांनी हाती घेतली आहे. हेल्मेट न वापरल्यामुळे किरकोळ अपघातातही डोक्याला मार लागल्यास गंभीर दुखापत किंवा मृत्यू होण्याचा धोका असतो. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी हेल्मेट वापरणाऱ्यांचा सत्कार करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. दर आठवड्याला सोडत काढून दहा जणांचा सत्कार यात करण्यात येणार आहे. हेल्मेटचे महत्त्व अनेकदा पटवून सांगितल्यानंतरही शहरातील अनेक चालक हेल्मेट वापरत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच काही दुचाकीस्वार न सांगताही स्वसुरक्षेसाठी जबाबदारीने हेल्मेटचा वापर करतात. अशा शिस्तप्रिय दुचाकीस्वारांचा सन्मान करून त्यांच्यासह इतरांना प्रोत्साहन देण्याचे काम शहर पोलिसांतर्फे केले जाणार आहे.

इतर बातम्या-

Kirit Somaiya : अनिल परबांचं रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या दापोलीत! आता थेट उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

MPSC Group C Admit Card: गट क वर्गासाठीचे परीक्षा प्रवेशपत्र जाहीर ; प्रवेशपत्र थेट ‘या’ लिंकवरुन करा डाऊनलोड

Follow Us
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?