AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

School Opens: औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात 5 वी ते 12 वीचे वर्ग उद्यापासून, शहराचा निर्णय काय?

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी एकूण 1224 एवढे रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. तर शहरातील बाधितांचा आकडा 779 एवढ्यावर पोहोचला. सध्या शहरातील 100 रुग्णांची तपासणी केली असता त्यातील 49 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहे.

School Opens: औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात 5 वी ते 12 वीचे वर्ग उद्यापासून, शहराचा निर्णय काय?
संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 12:38 PM
Share

औरंगाबादः राज्यभरात कोरोना संसर्ग वाढलेला असूनही त्याची तीव्रता मात्र कमी असल्याने अनेक जिल्ह्यांतील शाळा 24 जानेवारी अर्थात सोमवारपासून सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र मराठवाड्यात सर्वाधिक रुग्णसंख्येचा आकडा गाठणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा (Aurangabad district Schools) सुरु करायच्या की नाही, या संभ्रमात प्रशासन होते. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची आज यासंबंधी बैठक झाली. या बैठकीत जिल्हातील ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग सुरु राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उद्यापासून म्हणजेच 25 जानेवारीपासून ग्रामीण भागातील या वर्गांमध्ये ऑफलाइन पद्धतीने शिक्षण सुरु होईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

शहराची स्थिती काय?

औरंगाबाद शहरातील शाळांचा निर्णय पुढील आठवड्यात घेणार असल्याचं महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितलं होतं. सध्या शहरातील सध्या दहावी आणि बारावीचे वर्ग भरणार आहेत. कारण औरंगाबाद शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 49 टक्के आहे. कोरोना संसर्गाचे हे प्रमाण पाहता, स्थानिक प्रशासनाने शहरातील पहिली ते दहावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.

औरंगबादेत रविवारी किती रुग्ण?

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी एकूण 1224 एवढे रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. तर शहरातील बाधितांचा आकडा 779 एवढ्यावर पोहोचला. सध्या शहरातील 100 रुग्णांची तपासणी केली असता त्यातील 49 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहे. मात्र रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे आढळून येत नसल्याने 95 टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्येच ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

मराठवाड्यात औरंगाबाद, लातूर, नांदेडात सर्वाधिक रुग्ण

मराठवाड्यातील कोरोना रुग्णसंख्येने मागील आठवड्यापासून चार हजारांचा आकडा पार केला आहे. यात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद, लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबादमध्ये रविवारी 1224 रुग्ण आढळून आले तर लातूरात 771 आणि नांदेडमध्ये 786   एवढे कोरोनाबाधित आढळून आले.

इतर बातम्या-

Good News| उद्योगनगरी औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा, जगात पहिल्या 5 शहरांत बाजी, कोणत्या क्षेत्रात विक्रमी घोडदौड?

औरंगाबादकरांनो, आरोग्य सांभाळा, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पन्नाशीच्या दिशेने, वाचा शहरासह मराठवाड्याचे Updates!

Follow Us
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.