AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

 Aurangabad | उष्ण झळांनी मोर, लांडोर, माकडे सैरावैरा पळू लागली, दौलताबाद किल्ल्याभोवतीची आग अखेर शमली

किल्ल्याच्या आत अग्निशमन विभागाचा बंब जात नसल्याने किल्ले परिसरातील पाण्याद्वारेच आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आली. किल्ल्यातील कचेरी बारव आणि सरस्वती बारव खंदकातून मोटर लावून पाण्याच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

 Aurangabad | उष्ण झळांनी मोर, लांडोर, माकडे सैरावैरा पळू लागली, दौलताबाद किल्ल्याभोवतीची आग अखेर शमली
शुक्रवारी दौलताबाद किल्ले परिसरात आगImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 26, 2022 | 9:47 AM
Share

औरंगाबाद | पर्यटननगरी औरंगाबादचे वैभव (Aurangabad tourism) असलेल्या दौलताबादच्या किल्ल्याला (Daulatabad Fort) शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. मागील वर्षी याच महिन्यात आगीने किल्ल्याला (Fire in Daulatabad) वेढले होते. त्यानंतर पुन्हा यावर्षी तोच प्रकार घडला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुरु झालेली ही आग किल्ल्यातील मिनारपर्यंत पोहोचली. अचानक लागलेल्या या आगीमुळे गावातील नागरिकांची पळापळ झाली. किल्ल्याभोवतीची वनसंपदा आणि प्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी स्थानिक आणि प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले. दुपारी किल्ल्याच्या परिसरात सोसाट्याचा वारा होता, त्यामुळे आगही वेगाने फोफावली. काही वेळातच तिने रौद्ररुप धारण केले होते. किल्ल्याभोवतीचा जवळपास 350 एकर परिसर असल्याने ही आग लवकर नियंत्रणात आणणे कठीण होते. अखेर अग्निशमन विभागाच्या शर्थच्या प्रयत्नांनी आग विझवली गेली. शुक्रवारी दुपारी लागलेली ही आग विझवण्याच्या प्रयत्नांना सायंकाळी यश आले.

मोडर, लांडोर, माकडे सैरभैर

दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आहे. मात्र या आगीमुळे येथील पक्षी आणि प्राण्यांच्या जीवावर बेतले. आगीची तीव्रता वाढू लागली तशी येथील पक्षी, मोर, लांडोर, माकडे, सैरभेर झाली. परिसरातील झाचे मात्र आगीत जळून खाक झाली. काही प्राणाही या आगीत भाजले गेले. आगीनंतरचे हे दृश्य अत्यंत भयावह आणि निसर्गाचं विद्रुप स्वरुप दाखवणारं होतं. किल्ले परिसरातील ऐतिहासिक मिनार, शाही हमाम, रशीदबाग, जुन्या संग्रहालयापर्यंत आगीची धग पोहोचली.

किल्ल्यातीलच बारवेच्या पाण्याने विझवली आग

किल्ल्याच्या आत अग्निशमन विभागाचा बंब जात नसल्याने किल्ले परिसरातील पाण्याद्वारेच आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आली. किल्ल्यातील कचेरी बारव आणि सरस्वती बारव खंदकातून मोटर लावून पाण्याच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान अग्निशमन विभागाने रस्त्याच्या बाजूची आग विझवली. यात किल्ल्याच्या अवतीभोवती असलेली मोठी वनसंपदा जळून खाक झाली होती. सायंकाळी उशीरापर्यंत आगीचे लोळ दिसत होते.

आगीवर कायस्वरुपी उपाययोजना हवी

दौलताबाद किल्ला परिसरात मागील सहा वर्षांपासून आग लागण्याच्या घटना घडत आहे. किल्ल्याच्या भोवती खासगी जमिनींची संख्याही वाढली आहे. त्यात आसपासचे गावकरी गुरांना चरण्यासाठी तेथे घेऊन येतात. किल्ल्याभोवतीचा जवळपास 350 एकर परिसर असल्याने ही आग लवकर नियंत्रणात आणणे कठीण होते. पण वारंवार होणाऱ्या अशा प्रकारांवर कायम स्वरुपी उपाययोजना केली जावी, अशी मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे.

इतर बातम्या-

Nagpur Crime | अजनीमध्ये Star कासवांची तस्करी, वन विभागाने तीन आरोपींना केली अटक

कृषिमंत्री दादा भुसेंच्या कामांची ईडी, एसआयटी चौकशी करा; भाजपची व्हिडिओ लावून मागणी

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?