AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MIM चे बॅनर रातोरात काढले, महापालिका सुटीच्या दिवशीही सक्रिय, एमआयएमचा आरोप, औरंगाबादेत ‘घरकुल’ पेटले!

केंद्रातील भाजपला श्रेय मिळू नये म्हणून जिल्ह्यात शिवसेना घरकुल योजनेसाठी जागाच उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप भाजपने केला. तसेच केंद्र सरकारची बदनामी करण्यासाठी शिवसेनेनेच खासदारांना फूस लावल्याचा आरोप भाजपने केला आहे. 

MIM चे बॅनर रातोरात काढले, महापालिका सुटीच्या दिवशीही सक्रिय, एमआयएमचा आरोप, औरंगाबादेत 'घरकुल' पेटले!
महापालिकेने रातोरात बॅनर्स काढले
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 07, 2022 | 4:32 PM
Share

औरंगाबादः शहरात पंतप्रधान आवास योजनेचे काम ठप्प असल्याचा आरोप करत एमआयएमने औरंगाबादेत बॅनरबाजी केली. शहरातील प्रमुख ठिकाणी एमआयएमने (Aurangabad MIM) हे पोस्टर्स रविवारी झळकवले. केंद्र सरकारची ही योजना औरंगाबादेत अपयशी ठरल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केला असून याची बदनामी उत्तर प्रदेशातही करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र औरंगाबादेत लावण्यात आलेले हे बॅनर महानगरपालिकेने (Aurangabad Municipal Corporation) निम्म्या रात्रीतून काढून टाकले. शहरात कोणत्याही राजकीय पक्षांचे बॅनर लावू नयेत, असा महापालिकेचा नियम आहे. मात्र या नियमाची अंमलबजावणी ठराविक वेळेलाच होताना दिसते. पण एमआयएमचे बॅनर काढण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी सुटीच्या दिवशीही आल्याचा आरोप एमआयएमच्या वतीने करण्यात आला आहे. आता घरकुल योजनेचा (Gharkul Scheme) हा मुद्दा आणखी आक्रमकपणे लावून धरणार असल्याचा इशारा एमआयएमने दिला आहे.

काय आहे नेमका मुद्दा?

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजना अर्थात घरकुल योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात अगदी मोजकीच घरे नागरिकांना मिळाली असल्याचा खुलासा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी केला. जिल्ह्यात 88 हजार अर्जदारांपैकी फक्त 355 अर्जदारांनाच घरकुल मिळाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार ही योजना राबवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत एमआयएमने रविवारी ‘पंतप्रधान फेककुल योजना’, स्वप्नातलं घर स्वप्नातच असे उपरोधिक बॅनर औरंगाबादमध्ये झळकावले. मात्र महापालिकेने ते रातोरात काढून टाकले.

खासदारांना शिवसेनेची फूस- भाजप

दरम्यान, खासदार इम्तियाज जलील यांनी घरकुल योजनेचा हा मुद्दा लावून धरण्यामागे शिवसेनाच असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते संजय केणेकर पत्रकार परिषद घेतली होती. योजना केंद्र सरकारची असली तरीही केंद्रातील भाजपला श्रेय मिळू नये म्हणून जिल्ह्यात शिवसेना घरकुल योजनेसाठी जागाच उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप भाजपने केला. तसेच केंद्र सरकारची बदनामी करण्यासाठी शिवसेनेनेच खासदारांना फूस लावल्याचा आरोप भाजपने केला आहे.

एकूणच, एमआयएमने लावून धरलेला हा मुद्दा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे दिसतेय.

इतर बातम्या-

एकत्र बसून दारु प्यायचे, जेवणही करायचे, पण 100 रुपयांवरून वाजलं अन् हत्या केली, गादीत गुंडाळून जाळण्याचाही प्रयत्न

Valentine’s Day च्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात पुण्यातील गुलाब उत्पादकांसाठी घेऊन आले अच्छेदिन…! निर्यातीत मोठी घट

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली