Aurangabad | हिजाब गर्ल मुस्कानच्या सत्कार कार्यक्रमाला पोलिसांची आडकाठी, वंचित आघाडीची कोर्टात धाव, वाद पेटणार?

पोलिसांच्या या कारवाईविरोधात वंचित आघाडीच्या नेत्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. एकूणच, सुरुवातीला या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप विरुद्ध वंचित असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता पोलीस विरोधात वंचित असाही संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Aurangabad | हिजाब गर्ल मुस्कानच्या सत्कार कार्यक्रमाला पोलिसांची आडकाठी, वंचित आघाडीची कोर्टात धाव, वाद पेटणार?
हिजाब गर्ल मुस्कान खान हिच्या सत्कारावरून औरंगाबादेत वातावरण तापलं.
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 11:02 AM

औरंगाबादः हिजाब गर्ल मुस्कान खान (Hijab Girl Muskan khan) हिच्या सत्कार समारंभावरून औरंगाबादचं वातावरण चांगलंच पेटलं आहे. आज सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) वतीने मुस्कान खान हिचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला आहे. संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे शहरात आगमन झाले आहे.  दोन दिवसांपूर्वी भाजपच्या वतीने या कार्यक्रमाला आक्षेप घेतला होता. या कार्यक्रम होऊ नये, असे पत्रही पोलीस आयुक्तांना दिले होते. त्यानंतर भाजपचा विरोधा काहीसा मावळलेला दिसतानाच आता पोलिसांनी या कार्यक्रमाला आडकाठी घातली आहे. शहरातील आमखास मैदानावर या सत्कार सोहळ्याचे नियोजन कऱण्यात आले असून पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. पोलिसांच्या या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने केली असून पोलीस आणि वंचित आघाडी असा संघर्ष आज पहायला मिळणार आहे. त्यामुळे औरंगाबादचं वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

कर्नाटकमध्ये हिजाब घालण्यावरून सुरु झालेल्या वाद थंड झाला असताना, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कर्नाटकात चर्चेत आलेल्या मुस्कान खान हिचा सत्कार समारंभ औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचे नियोजन असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे शहरात आगमन झाले आहे. दोन दिवसांपूर्वी या कार्यक्रमाला भाजपच्या वतीने या कार्यक्रमाला विरोध केला होता. हा कार्यक्रम झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा भाजप नेते संजय केणेकर यांनी दिला होता. आज सोमवारी भाजपचा विरोध काहीसा मावळलेला दिसत असतानाच पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.

वंचित आघाडीची कोर्टात धाव

दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरीही आमखास मैदानावर आयोजित केलेला हा कार्यक्रम त्याच वेळेत आणि त्याच ठिकाणावर घेणार, असा ठाम निर्णय वंचित आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. पोलिसांच्या या कारवाईविरोधात वंचित आघाडीच्या नेत्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. एकूणच, सुरुवातीला या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप विरुद्ध वंचित असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता पोलीस विरोधात वंचित असाही संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इतर बातम्या-

Ind vs SL 2nd Test: तिसऱ्या दिवशी पिंक बॉल टेस्टचा निकाल निश्चित, टीम इंडिया विजयापासून 9 विकेट दूर

रेल्वेचा मोठा निर्णय, आता प्रवाशांना जनरल तिकीटावरही करता येणार प्रवास; ‘या’ गाड्यांचा समावेश

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.