AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | मराठवाड्यात लवकरच इलेक्ट्रिक रेल्वे, मनमाड-रोटेगाव दरम्यान प्रयोग यशस्वी

मराठवाड्यातून मुंबई, दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांना मनमाड येथे डिझेलचे इंजिन काढून इलेक्ट्रिक इंजिन लावावे लागते. त्यास किमान अर्धा तास वेळ लागतो. तो वेळ भविष्यात वाचणार आहे. मनमाडपर्यंतचा प्रवासही वेगात होईल.

Aurangabad | मराठवाड्यात लवकरच इलेक्ट्रिक रेल्वे, मनमाड-रोटेगाव दरम्यान प्रयोग यशस्वी
मनमाड ते रोटेगावपर्यंत इलेक्ट्रिक इंजिन धावले
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 26, 2022 | 4:06 PM
Share

औरंगाबादः गेल्या काही वर्षांपासून रेल्वेच्या बाबतीत पिछाडीवर राहिलेल्या मराठवाड्यातील अनेक प्रकल्प आता मार्गी लागताना दिसत आहे. मराठवाड्यातील (Marathwada) रेल्वे मार्गांचे (Railway Electrification) विद्युतीकरण हा त्यातलाच एक प्रकल्प आहे. सुरुवातीला मनमाड ते रोटेगावदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून या मार्गावर इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन (Electric engine) धावले आहे. पुढील टप्प्यात औरंगाबादपर्यंत इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन धावेल. त्यामुळे रेल्वेचा प्रवास गतिमान होण्यास मदत होईल. तसेच औरंगाबादपर्यंतचा टप्पा पूर्ण झाल्यावर मनमाड ते औरंगाबाद इलेक्ट्रिक इंजिन असलेली रेल्वे धावे. डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक इंजिनवर रेल्वे धावण्यासाठी औरंगाबादपर्यंत विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

मनमाडहून मुंबईकडे जाताना इंजिन बदलावे लागते

मनमाड ते रोटेगाव हा रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. यासाठी रोटेगाव येथे विद्युत टॉवर उभारले आहे. येथूनच वीजपुरवठा केला जाणार आहे. मराठवाड्यातून मुंबई, दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांना मनमाड येथे डिझेलचे इंजिन काढून इलेक्ट्रिक इंजिन लावावे लागते. त्यास किमान अर्धा तास वेळ लागतो. तो वेळ भविष्यात वाचणार आहे. मनमाडपर्यंतचा प्रवासही वेगात होईल.

जालना-जळगाव रेल्वेमार्गालाही गती

दरम्यान, जालना ते जळगाव या नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्मे विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक सध्या या मार्गावरील गावांना भेटी देत आहे. या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण तत्काळ करण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्या होत्या त्यानुसार, गुरुवार रेल्वे सदस्यांचे गुरुवारी दाखल झाले असून या मार्गाची पाहणी करत आहे. 174 किमीच्या रेल्वे मार्गामुळे राजुरी, अजिंठा आदी प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत.

इतर बातम्या-

थाली बजाव महागाई भगाओ, Congress कडून महागाई मुक्त भारत अभियान जाहीर

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 26 March 2022

Follow Us
संध्याकाळी 6 वाजता... पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर..
संध्याकाळी 6 वाजता... पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान