Aurangabad | जायकवाडीचा जलसाठा 75% पुढे, आज विसर्ग होण्याची शक्यता, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

औरंगाबाद शहरात सोमवारी जवळपास 9.2 मिमी पावसाची नोंद झाली. तर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 48.10 टक्के पाऊस झाला.

Aurangabad | जायकवाडीचा जलसाठा 75% पुढे, आज विसर्ग होण्याची शक्यता, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 9:48 AM

औरंगाबादः मागील आठवड्यापासून राज्यभरात विशेषतः नाशिक परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने औरंगाबादच्या (Aurangabad) जायकवाडी (Jayakwadi) धरणाचा साठा 75 टक्क्यांपुढे झाला आहे. काल रात्रीपासूनही धरणात पाण्याची आवक सुरुच आहे. कोणत्याही क्षणी धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होऊ शकते, असे जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. तसेच गोदावरी नदीकाठच्या (Godawari river) गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील आठवड्यात नाशिक आणि नगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. जायकवाडी धरण परिक्षेत्रातही पावसानं जोरदार हजेरी लावली. सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत जायकवाडी धरणाचा जलसाठा 74 टक्के झाला होता. त्यानंतरही पाण्याची आवक सुरुच होती. आज किंवा उद्या धरणातून विसर्ग सुरु होईल. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या 1522 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्याची तहान भागली

मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात मागील आठ दिवसांपासून आवक सुरु आहे. वरचे सर्व प्रकल्प 80 टक्के भरले आहेत. जायकवाडी धरणात मागील आठवड्यात 40 टक्के पाण्याची आवक झाली. जायकवाडीत सोमवारी संध्याकाळी पाणीसाठा 75 टक्क्यांवर पोहोचला. हा साठा 90 टक्क्यांवर पोहोचला की पाण्याचा विसर्ग सुरु केला जाणार आहे. सध्या दारणा, कडवा, वालदेवी, गंगापूर, आळंदी, नांदूर मध्यमेश्वर, नागमठाण या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी सुरुच आहे. त्यामुळे पाण्याची आवकही सुरुच आहे. म्हणून प्रशासनाने विसर्गाची तयारी सुरु केली आहे.

गोदाकाठच्या गावांना इशारा

जायकवाडी धरणातून विसर्ग केल्यानंतर पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या 14 गावांना फटका बसतो. प्रशासनाने सतर्कतेचा इसारा दिल्यानंतर या गावांत मोठी धावपळ सुरु झाली आहे. गोदावरी पात्रात सोडलेल्या मोटारी शेतकी काढून घेत होते. पात्रालगत असलेले बिऱ्हाड हलवण्याची घाई शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.

गोदाकाठी 1522 गावे

मराठवाड्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावरील गावांची जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे

  • औरंगाबाद- 43
  • जालना- 178
  • परभणी-286
  •  हिंगोली- 70
  •  नांदेड- 337
  • बीड- 306
  • लातूर- 158
  • उस्मानाबाद- 144
  • एकूण – 1522

औरंगाबाद शहरात पावसाचा जोर कायम

शनिवार आणि रविवारच्या विश्रांतीनंतर औरंगाबाद शहर आणि परिसरात सोमवारी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. शहरात सोमवारी जवळपास 9.2 मिमी पावसाची नोंद झाली. तर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 48.10 टक्के पाऊस झाला. चिकलठाणा वेधशाळेत 9.2 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.