AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Updates: महापालिका निवडणूकीवर सर्वोच्च न्यायालयात 3 मार्च रोजी सुनावणी, काय आहे याचिका?

याचिका निरकस्त म्हणून निकाली न काढता नव्याने राबवण्यात येणाऱ्या प्रभागरचना व आरक्षण प्रक्रियेत नियमांचे पालन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगास द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणावर येत्या 3 मार्च रोजी सुनावणी होईल.

Aurangabad Updates: महापालिका निवडणूकीवर सर्वोच्च न्यायालयात 3 मार्च रोजी सुनावणी, काय आहे याचिका?
औरंगाबाद महापालिका
| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 10:53 AM
Share

औरंगाबादः शहरातील महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात येत्या 3 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. महापालिकेच्या निवडणुक (Municipal corporation election) आराखड्यात यापूर्वी एक सदस्यीय प्रभाग रचना होती. मात्र राज्य सरकारने अध्यादेश काढून आता बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग रचनेची व आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया नव्याने करणे आवश्यक आहे. त्यामुळे याचिका निरस्त झाली असून ती फेटाळण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली आहे. अॅड. अजित कडेठाणकर हे न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडत आहेत.

काय आहे याचिका?

औरंगाबाद महापालिकेने 2015 मध्ये घेतलेल्या निवडणुकीत प्रभाग रचना अत्यंत विस्कळीत आणि राजकीय पक्षांच्या सोयीनुसार केल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. त्यामुळे यानंतर महापालिकेची जी निवडणूक होईल, त्यात अत्यंत पारदर्शक पद्धतीने प्रभाग रचना केली जावी, याकरिता समीर राजुरकर, सुरेश गवळी, उमाकांत दीक्षित आणि अनिव विधाते यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर 6 ऑक्टोबर 2020 रोजी जैसे आदेश मिळाले. एप्रिल 2019 मध्ये महापालिकेची मुदत संपली आहे. मात्र कोरोना संकटामुळे निवडणूक लांबणीवर पडली असून महापालिकेवर सध्या प्रशासक आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने बहुसदस्यीच प्रभाग रचनेचा अध्यादेश काढल्याने ही संपूर्ण याचिकाच निरस्त करण्याची विनंती निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली आहे.

याचिकाकर्त्याचं म्हणणं काय?

नव्याने प्रभागरचना व आरक्षणाची प्रक्रिया राबवण्यास हरकत नसल्याचे याचिकाकर्ते समीर राजूरकर यांनी स्पष्ट केले. मात्र यापूर्वी प्रभागरचना तसेच आरक्षणाची प्रक्रिया राबवताना कायदेशीर तरतुदींचा व गोपनीयता आदेशांचा भंग झाला. त्यामुळे याचिका निरकस्त म्हणून निकाली न काढता नव्याने राबवण्यात येणाऱ्या प्रभागरचना व आरक्षण प्रक्रियेत नियमांचे पालन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगास द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणावर येत्या 3 मार्च रोजी सुनावणी होईल.

इतर बातम्या-

Love Crime | आधी विवाहित महिलेशी संबंध, नंतर लग्न करुन खून, तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले ?

Mouny Roy Suraj nambiar wedding : ‘दोन जीवांचं मिलन’, सौंदर्याची खाण मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरजसोबत आज लग्नबंधनात अडकणार!

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.